शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अभिनव आर्किटेक्चरसाठी अधिवेशनात पाठपुरावा

By admin | Updated: July 17, 2017 04:29 IST

गरिब व गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुण्यातील एकमेव अनुदानित अभिनव आर्किटेक्चर महाविद्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गरिब व गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुण्यातील एकमेव अनुदानित अभिनव आर्किटेक्चर महाविद्यालय सुरू राहिले पाहिजे. राज्यशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता असून या महाविद्यालयाचा वैभवशाली वारसा जपला गेला पाहिजे. त्यासाठी येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे माजी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे व आमदार शरद रणपिसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुण्यातील भारतीय कला प्रसारणी सभेच्या कॉलेज आॅफ आर्किटेक्चरमध्ये (अभिनव आर्किटेक्चर) प्रवेश मिळावा, अशी इच्छा असते. मात्र, आर्किटेक्चर कौन्सिलच्या नियमावलीत बसत नसल्याने महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अभिनव अर्किटेक्चरकडे सध्या अपुऱ्या सुविधा आहेत, असे कौन्सिलकडून सांगितले जात असले तरी पुण्यातील सुमारे २० महाविद्यालयांपैकी अभिनव आर्किटेक्चरमधील विद्यार्थी विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत. विद्यार्थ्यांचा निकाल पाहता अद्याप महाविद्यालय बंद करण्याची वेळ आलेली नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हे महाविद्यालय वाचविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टोपे म्हणाले, अभिनव आर्किटेक्चर कॉलेजला मोठा वारसा आहे. पुण्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालाय असल्याने येथे गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. विद्यार्थी हितासाठी राज्यशासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाने संबंधीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाविद्यालय वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.