शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘पिलिग्रिम्स इन द डिजिटल वर्ल्ड’मधून सायबर हल्ल्यावर टाकला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:04 IST

पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘डेटा सिक्युरिटी’ हा सर्वांत सायबर हल्ल्यावरील परिणामकारक उपायन्यायप्रक्रियेशी संबंधित यंत्रणेपासून पोलीस यंत्रणेपर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता : संजय बहल

पुणे : पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत भारतीय संगणक प्रणाली आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले. माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ संदीप गोडबोले लिखित ‘पिलिग्रिम्स इन द डिजिटल वर्ल्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन बहल यांच्या हस्ते झाले. या वेळी टाटा कन्सल्टन्सीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सचिन लोढा आणि अदिती गोडबोले उपस्थित होते. बहल म्हणाले की, ‘दहशतवादाचा नवीन चेहरा सायबर हल्ल्यामार्फत जगापुढे आला आहे. संपूर्ण जग या अंतर्गत हल्ल्याच्या बचावासाठी यंत्रणा उभी करण्यात गुंतली आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या धोरणांवर आणि प्रयत्नांवर या हल्ल्याद्वारे नुकसान पोहोचवले जाते. हा मार्ग दहशतवाद्यांनादेखील सोयीचा असल्याने सायबर हल्ल्यांपासून देशाचा डेटा वाचविणे जिकिरीचे झाले आहे. डिजिटल समाज निर्मितीच्या ध्यासापोटी आपण आपली सुरक्षा धोक्यात तर आणत नाही ना, हे पाहणे गरजेचे ठरते. न्यायप्रक्रियेशी संबंधित यंत्रणेपासून गुन्ह्याच्या शोधात गुंतलेल्या पोलीस यंत्रणेपर्यंत सर्वच स्तरावर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सायबर हल्ल्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्की कोणत्या प्रकारचे पुरावे सादर करणे अपेक्षित आहे, या मूलभूत मुद्द्यापासून त्या प्रशिक्षणाचा प्रारंभ करावा लागेल.’ संदीप गोडबोले यांनी पुस्तकामागील भूमिका सांगितली.

टॅग्स :digitalडिजिटल