शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपूल हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:32 IST

गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

धायरी : गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे. राजारामपुल ते फनटाईम दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूककोंडीवर उड्डाणपूल हाच अखेरचा उपाय आहे. स्थानिक नगरसेवकांसह हवेली तालुका नागरी कृती समितीनेही या पुलाबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम गेली चार-पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर नुकताच या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडून वाहतूक सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरही राजारामपुल ते फनटाईम थिएटरपर्यंत दुपदरी उड्डाणपूल झाल्यास या रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यासाठी विविध नागरी संघटनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अनुकुलता दर्शवली आहे. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. रुंदीकरण होऊनही आनंदनगर चौक, सनसिटीकडे जाणाºया चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. फनटाईम थिएटरपर्यंत सिग्नलला वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यात शाळांच्या स्कूल बसेस, रुग्णवाहिका व पीएमपी बसेसही अडकून पडलेल्या असतात त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक (संतोष हॉल) व ब्रह्मा गार्डन चौकात दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूककोंडी असते. उड्डाणपुल झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो. तसेच धायरी उड्डाणपुलाखाली सिग्नल बसवावेत, तेथे वाहतूक पोलीस नसतात. खडकवासल्याकडून येणारी वाहने एकदम धायरीकडे वळतात, त्यामुळे अपघात होत आहेत. - चंदू कुंभार, धायरी, कर्मचारीमराठी व इंग्रजी शाळेत जाणारे लहान गटातील विद्यार्थी वेळेत घरी अथवा शाळेत पोहोचणे आवश्यक आहे. मुल घरी येईपर्यंत फार काळजी वाटते. उड्डाणपुल झाल्यास वाहतूककोंडी कमी होईल.- वैशाली चौगुले, गृहिणीमनपा हद्दीलगतच्या गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथून मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, पुण्यात येत असतात मात्र, सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरच खडकवासला धरण, एनडीए, सीडब्ल्यूपीआरएस आयएटी पानशेत धरण, असे महत्त्वपूर्ण प्रकल्प व संस्था आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. फनटाईम ते राजारामपूल हा उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. तसेच नांदेड येथील पुलाचे कामही वेगाने करावे, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.- श्रीरंग चव्हाण-पााटील, अध्यक्ष, हवेली तालुकानागरी कृती समिती