शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपूल हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:32 IST

गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

धायरी : गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे. राजारामपुल ते फनटाईम दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूककोंडीवर उड्डाणपूल हाच अखेरचा उपाय आहे. स्थानिक नगरसेवकांसह हवेली तालुका नागरी कृती समितीनेही या पुलाबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम गेली चार-पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर नुकताच या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडून वाहतूक सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरही राजारामपुल ते फनटाईम थिएटरपर्यंत दुपदरी उड्डाणपूल झाल्यास या रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यासाठी विविध नागरी संघटनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अनुकुलता दर्शवली आहे. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. रुंदीकरण होऊनही आनंदनगर चौक, सनसिटीकडे जाणाºया चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. फनटाईम थिएटरपर्यंत सिग्नलला वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यात शाळांच्या स्कूल बसेस, रुग्णवाहिका व पीएमपी बसेसही अडकून पडलेल्या असतात त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक (संतोष हॉल) व ब्रह्मा गार्डन चौकात दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूककोंडी असते. उड्डाणपुल झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो. तसेच धायरी उड्डाणपुलाखाली सिग्नल बसवावेत, तेथे वाहतूक पोलीस नसतात. खडकवासल्याकडून येणारी वाहने एकदम धायरीकडे वळतात, त्यामुळे अपघात होत आहेत. - चंदू कुंभार, धायरी, कर्मचारीमराठी व इंग्रजी शाळेत जाणारे लहान गटातील विद्यार्थी वेळेत घरी अथवा शाळेत पोहोचणे आवश्यक आहे. मुल घरी येईपर्यंत फार काळजी वाटते. उड्डाणपुल झाल्यास वाहतूककोंडी कमी होईल.- वैशाली चौगुले, गृहिणीमनपा हद्दीलगतच्या गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथून मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, पुण्यात येत असतात मात्र, सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरच खडकवासला धरण, एनडीए, सीडब्ल्यूपीआरएस आयएटी पानशेत धरण, असे महत्त्वपूर्ण प्रकल्प व संस्था आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. फनटाईम ते राजारामपूल हा उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. तसेच नांदेड येथील पुलाचे कामही वेगाने करावे, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.- श्रीरंग चव्हाण-पााटील, अध्यक्ष, हवेली तालुकानागरी कृती समिती