शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपूल हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:32 IST

गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

धायरी : गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे. राजारामपुल ते फनटाईम दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूककोंडीवर उड्डाणपूल हाच अखेरचा उपाय आहे. स्थानिक नगरसेवकांसह हवेली तालुका नागरी कृती समितीनेही या पुलाबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम गेली चार-पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर नुकताच या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडून वाहतूक सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरही राजारामपुल ते फनटाईम थिएटरपर्यंत दुपदरी उड्डाणपूल झाल्यास या रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यासाठी विविध नागरी संघटनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अनुकुलता दर्शवली आहे. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. रुंदीकरण होऊनही आनंदनगर चौक, सनसिटीकडे जाणाºया चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. फनटाईम थिएटरपर्यंत सिग्नलला वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यात शाळांच्या स्कूल बसेस, रुग्णवाहिका व पीएमपी बसेसही अडकून पडलेल्या असतात त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक (संतोष हॉल) व ब्रह्मा गार्डन चौकात दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूककोंडी असते. उड्डाणपुल झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो. तसेच धायरी उड्डाणपुलाखाली सिग्नल बसवावेत, तेथे वाहतूक पोलीस नसतात. खडकवासल्याकडून येणारी वाहने एकदम धायरीकडे वळतात, त्यामुळे अपघात होत आहेत. - चंदू कुंभार, धायरी, कर्मचारीमराठी व इंग्रजी शाळेत जाणारे लहान गटातील विद्यार्थी वेळेत घरी अथवा शाळेत पोहोचणे आवश्यक आहे. मुल घरी येईपर्यंत फार काळजी वाटते. उड्डाणपुल झाल्यास वाहतूककोंडी कमी होईल.- वैशाली चौगुले, गृहिणीमनपा हद्दीलगतच्या गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथून मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, पुण्यात येत असतात मात्र, सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरच खडकवासला धरण, एनडीए, सीडब्ल्यूपीआरएस आयएटी पानशेत धरण, असे महत्त्वपूर्ण प्रकल्प व संस्था आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. फनटाईम ते राजारामपूल हा उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. तसेच नांदेड येथील पुलाचे कामही वेगाने करावे, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.- श्रीरंग चव्हाण-पााटील, अध्यक्ष, हवेली तालुकानागरी कृती समिती