शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपूल हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:32 IST

गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

धायरी : गेली चार-पाच वर्षे रखडलेला कर्वे रस्त्यावरील उड्डाणपूल मार्गी लागला असतानाच आता सिंहगड रस्त्यावरही उड्डाणपुलाची मागणी जोर धरू लागली आहे. राजारामपुल ते फनटाईम दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूककोंडीवर उड्डाणपूल हाच अखेरचा उपाय आहे. स्थानिक नगरसेवकांसह हवेली तालुका नागरी कृती समितीनेही या पुलाबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम गेली चार-पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर नुकताच या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडून वाहतूक सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरही राजारामपुल ते फनटाईम थिएटरपर्यंत दुपदरी उड्डाणपूल झाल्यास या रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. त्यासाठी विविध नागरी संघटनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अनुकुलता दर्शवली आहे. सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. रुंदीकरण होऊनही आनंदनगर चौक, सनसिटीकडे जाणाºया चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. फनटाईम थिएटरपर्यंत सिग्नलला वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यात शाळांच्या स्कूल बसेस, रुग्णवाहिका व पीएमपी बसेसही अडकून पडलेल्या असतात त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक (संतोष हॉल) व ब्रह्मा गार्डन चौकात दररोज सकाळी व संध्याकाळी वाहतूककोंडी असते. उड्डाणपुल झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो. तसेच धायरी उड्डाणपुलाखाली सिग्नल बसवावेत, तेथे वाहतूक पोलीस नसतात. खडकवासल्याकडून येणारी वाहने एकदम धायरीकडे वळतात, त्यामुळे अपघात होत आहेत. - चंदू कुंभार, धायरी, कर्मचारीमराठी व इंग्रजी शाळेत जाणारे लहान गटातील विद्यार्थी वेळेत घरी अथवा शाळेत पोहोचणे आवश्यक आहे. मुल घरी येईपर्यंत फार काळजी वाटते. उड्डाणपुल झाल्यास वाहतूककोंडी कमी होईल.- वैशाली चौगुले, गृहिणीमनपा हद्दीलगतच्या गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. येथून मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, पुण्यात येत असतात मात्र, सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरच खडकवासला धरण, एनडीए, सीडब्ल्यूपीआरएस आयएटी पानशेत धरण, असे महत्त्वपूर्ण प्रकल्प व संस्था आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड भार आहे. फनटाईम ते राजारामपूल हा उड्डाणपूल झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. तसेच नांदेड येथील पुलाचे कामही वेगाने करावे, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.- श्रीरंग चव्हाण-पााटील, अध्यक्ष, हवेली तालुकानागरी कृती समिती