शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पाण्यासाठी रानोमाळ भटकंती!

By admin | Updated: March 14, 2016 01:23 IST

पाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने

सूर्यकांत किंद्रे,  भोरपाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने येथील दुर्गम गावांतील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. विहिरींचे पाणी कमी झाल्याने, तसेच शिवकालीन टाक्याही आटल्याने पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तेथून गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. भाटघर धरणात फक्त १९ टक्के, तर नीरा देवघर धरणात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरण भागातील मळे गावच्या महादेववाडी येथील शिवकालीन विहिरीचे पाणी आटल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तर, गृहिणी, चांदवणे, कुंबळे, कांबरे खुर्दचा उंबरमाळ, कांबरे बुद्रुक, चिकणेवाडी, सुकाळेवस्ती, अशिंपी, उंबार्डे, साळुंगण, जळकेवाडी, कोंडगावची सोनारवाडी, हुंबेवस्ती, पसुरेची सणसवाडी पाण्याची गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने मिळेल तेथील गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मळे, डेरे, कुरुंजी, करंदी बुद्रुक, करंदी खुर्द, वाकांबे, गोरड, म्हशीवली, वाढाणे, आस्कवडी, जोगवडी, लव्हेरी, माजगाव, वेळवंड, जयतपाड, रांजणवाडी, गायमाळ, पसुरे या गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी कमी पडत आहे. नीरा देवघर धरण भागातील रायरीची धारांबेवाडी, धानवली व निवंगण येथे रायरेश्वर किल्ल्यावरून उताराने नळपाणीपुरवठा योजना केल्या आहेत. मात्र, जानेवारीपासून पाणी कमी पडायला सुरुवात होऊन मार्चला येणारे पाणी पूर्ण बंद झाले आहे. त्यामुळे धारांबे येथे चार हंडे वाटून घेतले जातात. पाणी बैलगाडी किंवा खासगी गाड्या, टँॅकरने धरणावरून आणावे लागत आहे. धानवलीतही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निवंगण गावातील शिवकालीन विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीतून दररोज दोन हंडे पाणी वाटून घेतले जात आहे. अधिकचे पाणी अर्धा किलोमीटरवर असलेल्या ओढ्यावरून व दोन किलोमीटरवर असणाऱ्या गुढे येथील विहिरीवरून डोंगर चढून आणावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अशीच परिस्थिती होत असल्याचे निवंगणचे सरपंच किसन दिघे यांनी सांगितले. याच भागातील पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, शिरवली हि. मा., कुडली बु., मानटवस्ती या गावांतही तीन ते चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. 1टंचाईग्रस्त गावातून आलेल्या टँकर मागणीनुसार सदर गावात पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्तरीत्या दौरा काढून उपलब्ध पाण्याच्या स्रोताची पाहणी करून त्यानंतरच टँॅकर देण्यात येणार असल्याचे तहसीलदार वर्षा शिंगण व गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी सांगितले. मात्र, पाहणीला वेळ कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. 2महुडे बुद्रुुकची गोरेवस्ती व हुंबे, पसुरेची सणसवाडी या गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत आले आहेत. तर भाटघर धरणभागातील अनेक गावांचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच ग्रामसेवकांनी तयार केले आहेत. मात्र, तलाठी पंचनामा करून प्रस्तावावर सह्या करीत नसल्याने प्रस्ताव सादर करता येत नसल्याचे नागरिक सांगतात. याकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.