शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
6
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
7
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
8
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
9
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
10
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
11
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
12
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
13
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
14
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
15
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
16
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
18
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
20
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

पाण्यासाठी रानोमाळ भटकंती!

By admin | Updated: March 14, 2016 01:23 IST

पाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने

सूर्यकांत किंद्रे,  भोरपाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने येथील दुर्गम गावांतील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. विहिरींचे पाणी कमी झाल्याने, तसेच शिवकालीन टाक्याही आटल्याने पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तेथून गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. भाटघर धरणात फक्त १९ टक्के, तर नीरा देवघर धरणात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरण भागातील मळे गावच्या महादेववाडी येथील शिवकालीन विहिरीचे पाणी आटल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तर, गृहिणी, चांदवणे, कुंबळे, कांबरे खुर्दचा उंबरमाळ, कांबरे बुद्रुक, चिकणेवाडी, सुकाळेवस्ती, अशिंपी, उंबार्डे, साळुंगण, जळकेवाडी, कोंडगावची सोनारवाडी, हुंबेवस्ती, पसुरेची सणसवाडी पाण्याची गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने मिळेल तेथील गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मळे, डेरे, कुरुंजी, करंदी बुद्रुक, करंदी खुर्द, वाकांबे, गोरड, म्हशीवली, वाढाणे, आस्कवडी, जोगवडी, लव्हेरी, माजगाव, वेळवंड, जयतपाड, रांजणवाडी, गायमाळ, पसुरे या गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी कमी पडत आहे. नीरा देवघर धरण भागातील रायरीची धारांबेवाडी, धानवली व निवंगण येथे रायरेश्वर किल्ल्यावरून उताराने नळपाणीपुरवठा योजना केल्या आहेत. मात्र, जानेवारीपासून पाणी कमी पडायला सुरुवात होऊन मार्चला येणारे पाणी पूर्ण बंद झाले आहे. त्यामुळे धारांबे येथे चार हंडे वाटून घेतले जातात. पाणी बैलगाडी किंवा खासगी गाड्या, टँॅकरने धरणावरून आणावे लागत आहे. धानवलीतही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निवंगण गावातील शिवकालीन विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीतून दररोज दोन हंडे पाणी वाटून घेतले जात आहे. अधिकचे पाणी अर्धा किलोमीटरवर असलेल्या ओढ्यावरून व दोन किलोमीटरवर असणाऱ्या गुढे येथील विहिरीवरून डोंगर चढून आणावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अशीच परिस्थिती होत असल्याचे निवंगणचे सरपंच किसन दिघे यांनी सांगितले. याच भागातील पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, शिरवली हि. मा., कुडली बु., मानटवस्ती या गावांतही तीन ते चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. 1टंचाईग्रस्त गावातून आलेल्या टँकर मागणीनुसार सदर गावात पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्तरीत्या दौरा काढून उपलब्ध पाण्याच्या स्रोताची पाहणी करून त्यानंतरच टँॅकर देण्यात येणार असल्याचे तहसीलदार वर्षा शिंगण व गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी सांगितले. मात्र, पाहणीला वेळ कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. 2महुडे बुद्रुुकची गोरेवस्ती व हुंबे, पसुरेची सणसवाडी या गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत आले आहेत. तर भाटघर धरणभागातील अनेक गावांचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच ग्रामसेवकांनी तयार केले आहेत. मात्र, तलाठी पंचनामा करून प्रस्तावावर सह्या करीत नसल्याने प्रस्ताव सादर करता येत नसल्याचे नागरिक सांगतात. याकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.