शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रानोमाळ भटकंती!

By admin | Updated: March 14, 2016 01:23 IST

पाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने

सूर्यकांत किंद्रे,  भोरपाण्याची टाकी असलेल्या भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडत चालले आहे. मे महिन्यात असलेली परिस्थिती यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आल्याने येथील दुर्गम गावांतील नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. विहिरींचे पाणी कमी झाल्याने, तसेच शिवकालीन टाक्याही आटल्याने पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तेथून गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. भाटघर धरणात फक्त १९ टक्के, तर नीरा देवघर धरणात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरण भागातील मळे गावच्या महादेववाडी येथील शिवकालीन विहिरीचे पाणी आटल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. तर, गृहिणी, चांदवणे, कुंबळे, कांबरे खुर्दचा उंबरमाळ, कांबरे बुद्रुक, चिकणेवाडी, सुकाळेवस्ती, अशिंपी, उंबार्डे, साळुंगण, जळकेवाडी, कोंडगावची सोनारवाडी, हुंबेवस्ती, पसुरेची सणसवाडी पाण्याची गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने मिळेल तेथील गढूळ, दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मळे, डेरे, कुरुंजी, करंदी बुद्रुक, करंदी खुर्द, वाकांबे, गोरड, म्हशीवली, वाढाणे, आस्कवडी, जोगवडी, लव्हेरी, माजगाव, वेळवंड, जयतपाड, रांजणवाडी, गायमाळ, पसुरे या गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी कमी पडत आहे. नीरा देवघर धरण भागातील रायरीची धारांबेवाडी, धानवली व निवंगण येथे रायरेश्वर किल्ल्यावरून उताराने नळपाणीपुरवठा योजना केल्या आहेत. मात्र, जानेवारीपासून पाणी कमी पडायला सुरुवात होऊन मार्चला येणारे पाणी पूर्ण बंद झाले आहे. त्यामुळे धारांबे येथे चार हंडे वाटून घेतले जातात. पाणी बैलगाडी किंवा खासगी गाड्या, टँॅकरने धरणावरून आणावे लागत आहे. धानवलीतही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निवंगण गावातील शिवकालीन विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीतून दररोज दोन हंडे पाणी वाटून घेतले जात आहे. अधिकचे पाणी अर्धा किलोमीटरवर असलेल्या ओढ्यावरून व दोन किलोमीटरवर असणाऱ्या गुढे येथील विहिरीवरून डोंगर चढून आणावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अशीच परिस्थिती होत असल्याचे निवंगणचे सरपंच किसन दिघे यांनी सांगितले. याच भागातील पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, शिरवली हि. मा., कुडली बु., मानटवस्ती या गावांतही तीन ते चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. 1टंचाईग्रस्त गावातून आलेल्या टँकर मागणीनुसार सदर गावात पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्तरीत्या दौरा काढून उपलब्ध पाण्याच्या स्रोताची पाहणी करून त्यानंतरच टँॅकर देण्यात येणार असल्याचे तहसीलदार वर्षा शिंगण व गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी सांगितले. मात्र, पाहणीला वेळ कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. 2महुडे बुद्रुुकची गोरेवस्ती व हुंबे, पसुरेची सणसवाडी या गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत आले आहेत. तर भाटघर धरणभागातील अनेक गावांचे प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच ग्रामसेवकांनी तयार केले आहेत. मात्र, तलाठी पंचनामा करून प्रस्तावावर सह्या करीत नसल्याने प्रस्ताव सादर करता येत नसल्याचे नागरिक सांगतात. याकडे प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.