शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST

पुणे : भगवी पताका हे राष्ट्र, धर्म, परमार्थ आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे. भगवा ध्वज ही देवालयाची निशाणी आहे. देवालयावर ...

पुणे : भगवी पताका हे राष्ट्र, धर्म, परमार्थ आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे. भगवा ध्वज ही देवालयाची निशाणी आहे. देवालयावर द्विकेतू ध्वज फडकवला जातो, ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम यांनी लंकेवर आणि अयोध्येवर देखील ध्वज फडकावला होता. ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समितीच्या वतीने मंदिर तेथे ध्वज या अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील मंदिरात प्रत्येकी एक याप्रमाणे पाच हजार ध्वज उभारले जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात श्रीराम मंदिर, तुळशीबाग येथे ध्वजपूजनाने झाली. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, श्री रामजी संस्थान तुळशीबागचे रामदास तुळशीबागवाले, विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख मनोहर ओक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री संजय मुरदाळे, नागनाथ बोंगरगे, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, ‘मंदिरे ही संकल्पना सामाजिक अंगाने बांधली गेली आहे. पूर्वी मंदिरात न्यायनिवाडा, भजन, गायन यात्रा हे सगळे व्हायचे. त्यामुळे समाजातील लोक त्यानिमित्ताने एकत्र येत असत. त्यामुळे मंदिरे ही केवळ पूजेसाठी नव्हती. मंदिरे ही एकात्मता आणि अस्मितेचे प्रतीक आहेत.’

बाबूजी नाटेकर म्हणाले, ‘मंदिर हा समाजाचा केंद्रबिंदू आणि श्रद्धास्थान आहे. देशात आनंद आणि निकोप व्यवस्था निर्माण होण्यासाठी या श्रद्धास्थानांची पुर्नस्थापना होणे गरजेचे आहे. समाज विस्कळीत करायचा असेल, तर भारतीयांची श्रद्धास्थाने मोडली पाहिजेत, हे परकीयांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी राजवाडे, महाल नाही तर, मंदिरांची तोडफोड केली. त्यामुळे मंदिरांची पुर्नस्थापना झाली तर भारताची अस्मिता पुन्हा निर्माण होईल. समाजप्रबोधन आणि जागृतीचे केंद्रस्थान मंदिर व्हायला हवे.’