शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

अपघातात निगडीतील एकाच कुटुंबातील पाच ठार ; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:26 IST

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात : मोटारीचा टायर फूटून

पळसदेव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निगडीतल एका कुटुंबावर काळाने झडप घातली. मोटारीचा टायर फुटल्याने पाच पलट्या खात विरूद्ध दिशेला येऊन दुसºया मोटारीला धडकली. या भीषण पाच जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. तर दुसºया वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत.इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर १ गावच्या हद्दीत  शुक्रवारी (दि.१८ )सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, मोटारीचा चक्काचूर झाल्याने दोन जणांचे मृतदेह गॅस कटरने मोटारीचा पत्रा कापून एक तासानंतर बाहेर काढण्यात आले.

शितल संदीप गायकवाड (वय ३२), संदीप प्रकाश गायकवाड ( वय ४0), आभिराज संदीप गायकवाड (वय ५)  , सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८), प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७,  सर्व राहणार नाना नानी पार्क, यमुना नगर निगडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. यात पती-पत्नी, मुलगा, सून व नातू यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३२),  हेमा प्रमोद गायकवाड (वय २९) यांचा समावेश आहे. 

स्कॉर्पिओ मोटार सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात होती. डाळज नंबर १ गावचे हद्दीत आली असता, मोटारीचा टायर फुटला. अन ही मोटार पाच पलटया खात सोलापूर बाजूकडे जात असलेल्या दुसºया मोटारीस धडकली. या झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ मोटारीतील पाच जण जागीच ठार झाले.  तसेच दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेग हाच अपघाताला कारणीभूत ठरला. अपघाताचा आवाज येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माहिती मिळताच, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सचिन जगताप, गोरख पवार, वाघ, यांसह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत  जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत. भरधाव वेगाने घेतले बळीपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. भरधाव वेग अन पुढे जाण्याची स्पर्धा यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. चारचाकी वाहने ससरासरी १४0 वेगाने जातात. या वेगामुळे टायर गरम होऊन फुटणे, ब्रेक निकामी होणे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र या कडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. स्पीड गण मशीन कधी बनविणार? महामार्गचे चौपदरीकरण झाले खरे. मात्र रस्ता सुसज्ज झाल्याने सहाजिकच वाहनांचा वेग वाढला. अन अपघातांचे प्रमाण वाढले. स्पीड मशीन बसविल्यास वाहनांचा वेग समजू शकेल. मात्र याबाबत कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. या भरधाव वेगाने अनेकांचे बळी घेतले आहेत.