शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
5
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
6
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
7
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
8
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
9
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
10
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
11
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
12
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
13
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
14
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
15
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
16
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
17
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
18
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
19
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
20
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?

अपघातात निगडीतील एकाच कुटुंबातील पाच ठार ; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:26 IST

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात : मोटारीचा टायर फूटून

पळसदेव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निगडीतल एका कुटुंबावर काळाने झडप घातली. मोटारीचा टायर फुटल्याने पाच पलट्या खात विरूद्ध दिशेला येऊन दुसºया मोटारीला धडकली. या भीषण पाच जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. तर दुसºया वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत.इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर १ गावच्या हद्दीत  शुक्रवारी (दि.१८ )सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, मोटारीचा चक्काचूर झाल्याने दोन जणांचे मृतदेह गॅस कटरने मोटारीचा पत्रा कापून एक तासानंतर बाहेर काढण्यात आले.

शितल संदीप गायकवाड (वय ३२), संदीप प्रकाश गायकवाड ( वय ४0), आभिराज संदीप गायकवाड (वय ५)  , सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८), प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७,  सर्व राहणार नाना नानी पार्क, यमुना नगर निगडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. यात पती-पत्नी, मुलगा, सून व नातू यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३२),  हेमा प्रमोद गायकवाड (वय २९) यांचा समावेश आहे. 

स्कॉर्पिओ मोटार सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात होती. डाळज नंबर १ गावचे हद्दीत आली असता, मोटारीचा टायर फुटला. अन ही मोटार पाच पलटया खात सोलापूर बाजूकडे जात असलेल्या दुसºया मोटारीस धडकली. या झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ मोटारीतील पाच जण जागीच ठार झाले.  तसेच दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेग हाच अपघाताला कारणीभूत ठरला. अपघाताचा आवाज येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माहिती मिळताच, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सचिन जगताप, गोरख पवार, वाघ, यांसह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत  जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत. भरधाव वेगाने घेतले बळीपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. भरधाव वेग अन पुढे जाण्याची स्पर्धा यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. चारचाकी वाहने ससरासरी १४0 वेगाने जातात. या वेगामुळे टायर गरम होऊन फुटणे, ब्रेक निकामी होणे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र या कडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. स्पीड गण मशीन कधी बनविणार? महामार्गचे चौपदरीकरण झाले खरे. मात्र रस्ता सुसज्ज झाल्याने सहाजिकच वाहनांचा वेग वाढला. अन अपघातांचे प्रमाण वाढले. स्पीड मशीन बसविल्यास वाहनांचा वेग समजू शकेल. मात्र याबाबत कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. या भरधाव वेगाने अनेकांचे बळी घेतले आहेत.