शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाजरीच्या भाकरीमधून पाच जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:45 IST

रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे.

परिंचे : येथे रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. रुग्णांवर सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून रोग पडलेल्या पिकांची बाजरी खाण्यासाठी न वापरण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नितानेकर यांनी केले आहे.परिंचे, वीर परिसरातील बाजरीवर आर्किड नावाच्या बुरशीचा व आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. बाजरीची पिके जोमात येऊनही या रोगामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे. पुरंदर कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ तज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन बाजरीपिकाची पाहणी केली होती. पिकांवर पडलेल्या रोगाचे प्रमाण पाहता बाजरीचे धान्य अथवा जनावरांना चारा न घालण्याचे आव्हान कृषी अधिकाऱ्यांनी केले होते. पदरात पडलेले धान्य फेकून कसे द्यायचे व वर्षभर काय खायचे, या भावनेने शेतकºयांनी मात्र बाजरीचे धान्य खाण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या बाजरीच्या भाकरीमधून विषबाधा झाल्याची घटना परिंचेनजीक जोगमळा येथे घडली आहे.नीलेश मारुती जाधव यांच्या घरी संध्याकाळच्या जेवण्यासाठी प्रादुर्भाव झालेल्या बाजरीची भाकरी करण्यात आली. घरातील सर्वांनी रात्री जेवण केले. मध्यरात्रीच्या वेळेस सर्वांना पोटदुखी, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे हा त्रास सुरू झाला. थोड्याच वेळात सर्वांना उलट्या चालू झाल्या.सर्व रुग्णांना तातडीने परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यावर सर्व रुग्णांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मी जाधव, संतोष जाधव, मंदा जाधव, गणेश चव्हाण, ओम जाधव यांना विषबाधा झाली.सद्य:स्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिरसागर यांनी सांगितले. तसेच दूषित बाजरीचे धान्य न खाण्याचे आवाहन केले.