शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला एकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

(स्टार १०९४ डमी) पुणे : भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात फारसा काही फरक पडलेला ...

(स्टार १०९४ डमी)

पुणे : भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात फारसा काही फरक पडलेला नाही. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात तर सलग दोन दिवस सुटी आल्याने भाजीपाल्याचे दर निम्म्याने घटले होते. उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांना तर प्रचंड तोटा सहन करावा लागला.

एखादे पीक शेतकरी ३ ते ६ महिने किंवा ९ महिन्यांच्या कालावधीत घेत असतो. या काळात खुरपणी, खत, पाणी, वाहतूक आदी कारणांसाठी त्याचा भरमसाठ खर्च होत असतो. जेव्हा तो माल बाजारात विक्रीला घेऊन येतो. तेव्हा त्याच्याकडून किरकोळ व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करतात. त्यात त्याचा उत्पादन किंवा वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे त्याच्या परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. याउलट व्यापारी मात्र, दुप्पट-चौपट दराने ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. तसेच हमीभावाची देखील मागणी करत आहेत.

------

* कोणत्या भाजीला काय भाव

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी १२-१६ ४०

टोमॅटो २-४ २०

भेंडी १२-१६ ४०

चवळी १२-१६ ४०

पालक ४-६ १०

कोथिंबीर २-४ १०

मेथी ४-६ १०

हिरवी मिरची १५-२० ५०-६०

पत्ताकोबी ३-४ २०

फूलकोबी १०-१२ ४०

दोडके ८-१० ४०

-------

* शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

१) कोथिंबीर लावली होती. तीन-चार महिन्याचा उत्पादन खर्च खूप होता. जेव्हा मार्केट यार्डात विक्रीसाठी आणली तेव्हा एका गड्डीला २ ते ४ रुपये दर मिळाला. त्यामुळे कोथिंबिरीचा उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघाला नाही.

- संजय कदम, शेतकरी

----

२) दोन एकरांत कोबी लावली होती. मात्र, यंदा बाजारात कोबीला भावच नाही. पहिल्या तोड्याच्या वेळी बाजारा कोबी विक्रीला नेली. तेव्हा वाहतूक खर्चही पदरचा करावा लागला. त्यामुळे दोन एकरातील कोबी जनावरांना सोडली.

- शहाजी थोरात, शेतकरी

-----

* ग्राहकांना परवडेना...

शेतकऱ्यांकडून मार्केट यार्डातील बाजारात किरकोळ विक्रेत हे कवडीमोल भावात मालाची खरेदी करतात. मात्र, इतर ठिकाणी हे व्यापारी तिप्पट-चौपट दराने ग्राहकांना विक्री करत आहेत. होलसेल बाजारात शेतकऱ्यांकडून ३ ते ४ रुपये किलोने पत्ताकोबी घेऊन ती पुढे किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलोने किरकोळ व्यापारी विकत आहेत. आर्थिकदृष्ट्या ते आम्हाला परवडत नाही. त्यामुळे आम्ही सध्या भाजीपाला घेतच नाही.

- संगीता पठारे, ग्राहक

-----

* भावात एवढा फरक का?

मार्केट यार्डातून ३ रुपयाला १०० मेथीच्या जुडी घेतल्यावर त्या आणण्यासाठी वाहतूक खर्च लागतो. तसेच घेतलेल्या १०० जुड्यांमध्ये १० ते १५ जुड्या खराब निघतात. त्याचा खर्च भरून काढण्यासाठी आम्हाला साहजिकच दर वाढवावे लागतात. आमचा तो खर्च आणि काही प्रमाणात नफा या दृष्टीने आम्हाला दर वाढवावेच लागतात.

- हिरामण आल्हाट, किरकोळ व्यापारी