शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नीरा भीमाचे साडेपाच लाख टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या यशस्वी गळीत हंगामाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बावडा : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या यशस्वी गळीत हंगामाची सांगता माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून बुधवारी करण्यात आली. कारखान्याने १३० दिवसांत चांगले नियोजन करीत ५ लाख ६० हजार टन उसाचे गाळप करून उत्कृष्टरीत्या हंगाम पार पाडल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.

याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, की कारखान्याचा चालू गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, गळीत हंगाम हा कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने अपेक्षेपेक्षा लवकर संपवावा लागला. या हंगामात कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून २ कोटी ८० लाख युनिटची विक्री करण्यात आली. आसवणी प्रकल्पातून ६३ लाख लि.चे उत्पादन घेण्यात आले आहे. आजपर्यंत इथेनॉलचे ४३ लाख लिटरचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्पातून १५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे ३५०० मे.टन बगॅस बचत झाली आहे. कृषिरत्न सेंद्रिय खताचे उत्पादनाचे २ लाख बॅग निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातील सहकार क्षेत्रातील पहिला बायो-सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प नीरा भीमा कारखाना उभारणार आहे, अशी माहिती या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जामदार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष घोगरे यांनी केले.