शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नीरा भीमाचे साडेपाच लाख टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या यशस्वी गळीत हंगामाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बावडा : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या यशस्वी गळीत हंगामाची सांगता माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून बुधवारी करण्यात आली. कारखान्याने १३० दिवसांत चांगले नियोजन करीत ५ लाख ६० हजार टन उसाचे गाळप करून उत्कृष्टरीत्या हंगाम पार पाडल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.

याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, की कारखान्याचा चालू गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, गळीत हंगाम हा कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने अपेक्षेपेक्षा लवकर संपवावा लागला. या हंगामात कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून २ कोटी ८० लाख युनिटची विक्री करण्यात आली. आसवणी प्रकल्पातून ६३ लाख लि.चे उत्पादन घेण्यात आले आहे. आजपर्यंत इथेनॉलचे ४३ लाख लिटरचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्पातून १५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे ३५०० मे.टन बगॅस बचत झाली आहे. कृषिरत्न सेंद्रिय खताचे उत्पादनाचे २ लाख बॅग निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातील सहकार क्षेत्रातील पहिला बायो-सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प नीरा भीमा कारखाना उभारणार आहे, अशी माहिती या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जामदार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष घोगरे यांनी केले.