शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

भारतात अद्यापहीी काेराेनाची पहिली लाट अाेसरलेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST

डॉ. रमण गंगाखेडकर : कोरोनाच्या लसीकरणानंतरच ‘न्यू नॉर्मल’ शक्य राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ...

डॉ. रमण गंगाखेडकर : कोरोनाच्या लसीकरणानंतरच ‘न्यू नॉर्मल’ शक्य

राजानंद मोरे/प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : भारतातील कोरोनाची पहिली लाटच अद्याप ओसरलेली नाही. दुसरी लाट रोखायची असेल तर नागरिकांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगु शकणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’च्या विशेष मुलाखतीत दिला.

-----------

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत काय सांगाल? दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का?

- लॉकडाऊनमध्ये लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे आपल्याकडे प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांनी कोरोनाची पहिली लाट आली. ती अद्याप अजूनही ओसरलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधता येणार नाही. वेगवेगगळ्या शहरांत वेगवेगळ्या वेळेत ही लाट येऊ शकते. दक्षता घेतली तर कदाचित आपण दुसऱ्या लाटेला रोखु शकु.

---------

जगभरात सुरू असलेल्या लशींच्या विकसन प्रक्रियेकडे कसे पाहता?

- जगात यापुर्वीही कधीही १० ते ११ महिन्यांमध्ये लस विकसित झाली नव्हती. सध्या भारताता आठ लसी चाचणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. फायझर, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींची परिणामकारकता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे दिसून आले. लस विकसित करताना प्रतिकारशक्ती जागृत करणाऱ्या स्पाईक प्रोटिनचा वापर करण्यात आला आहे. भारतातही या प्रोटिनचा वापर झाल्याने परिणामकारक निकाल हाती येतील.

---------------

लसीचा एक डोस घेतल्यानंतरही हरयाणाचे मंत्री कोरोनाबाधित झाले, यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते का?

- चाचणीमध्ये ५० टक्के लोकांना प्रत्यक्ष लस आणि ५० टक्के लोकांना प्लासबो (अपरिणामकारक लससदृश द्रवपदार्थ) दिला जातो. या मंत्र्यांना प्रत्यक्ष लस मिळाली की प्लासबो दिला ते पाहावे लागेल. तसेच त्यांना दुसरा डोस दिला नव्हता. लस मिळाली असली तरी पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यानंतरच प्रतिकारशक्ती निर्माण होते. मंत्र्यांना अर्धवट डोस झाल्याने लागण झाली. एकच डोस घेऊन जर आपण दक्षता घेतली नाही तर ते चुकीचे ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीने दोन डोस घेणे जरूरीचे असते.

-----------------

कोरोनाला रोखण्यासाठी भारतात किती लोकांना लस द्यावी लागेल?

- काही अभ्यासांनुसार ५५ ते ८० टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर त्याला ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणता येईल. आपल्याकडे सप्टेंबरमध्ये झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये ६ टक्के म्हणजे सुमारे ८ कोटी लोकांना लागण होऊन गेलेली असावी, असे आढळून आले. डिसेंबरमध्ये ही संख्या तिप्पट झाली तरी सुमारे २४ ते २५ कोटी लोकांना लागण झाली असे म्हणता येईल. हे प्रमाण भारतात ७० टक्क्यांपर्यंत जाणारे नाही. त्यामुळे आपल्याला लस द्यावीच लागणार आहे.

--------------

चौकट १

हर्ड इम्युनिटी विषयी बोलताना गंगाखेडकर म्हणाले, हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली नाही. तसे असते तर पुण्या-मुंबईसह अन्य शहरांमध्ये लोकांना लागण झाली नसती. नवीन लोकांमध्ये लागण झाल्याची संख्या जवळजवळ नाही इथपर्यत आलेली दिसली असती. अजूनही कुठल्याही राज्यात हजारोंच्या संख्येत लागण होतेय.

---------------