शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पहिले पाणी, मग जत्रा

By admin | Updated: April 10, 2016 04:02 IST

गेले कित्येक वर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अजिवली गावातील तरुणांनी यंदा ग्रामदैवत वाघजाई देवीचा वार्षिक उत्सव रद्द केला आहे. आधी पिण्याचे पाणी मग जत्रा

वडगाव मावळ : गेले कित्येक वर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अजिवली गावातील तरुणांनी यंदा ग्रामदैवत वाघजाई देवीचा वार्षिक उत्सव रद्द केला आहे. आधी पिण्याचे पाणी मग जत्रा, असा निश्चय करून ग्रामस्थांनी केला. जत्रेसाठी येणारा खर्च वाचवून त्यातून गायरानात तळे खोदण्यास सुरुवात केली आहे. तळ्याला पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मार्च ते जून महिना गावातील महिलांसाठी अतिशय कठीण काळ असतो. आपल्या घरातून दिसणारा पवना धरणाचा मोठा जलाशय फक्त नजरेतच साठवून ठेवावा लागतो. ग्रामपंचायतीच्या वतीने धरणात सोडलेल्या मोटारी पाण्याची गरज असलेल्या काळात कोरड्या पडतात. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मोटारीनेदेखील पाणी गावाला पुरवता येत नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था या गावातील नागरिकांची झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर असल्यामुळे पहाटे चार ते पाच वाजल्यापासूनच महिला, लहान मुली, पुरुषांची विहिरीभोवती पाण्यासाठी रांग लागलेली असते. त्यात ही विहीरदेखील गावाबाहेर असल्यामुळे तीन-तीन हंडे डोक्यावर घेऊन एक ते अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. आपल्या घरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, हीच बाब या गावातील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याने गावातील सूत्रे आपल्या हातात घेतली व गेल्या वर्षभरात गावातील विकासकामांवर भर देण्याचे ठरवले. नवसाला पावणारी वाघजाई देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या देवीचा उत्सव हा देवीच्या बगाडाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. यात्रेतील मनोरंजक कार्यक्रमांवर होणारा खर्च पाण्यासाठी वापरण्याचे तरुणांनी ठरवले. परंतु, गावाची शेकडो वर्षांची परंपरा असणारी जत्रा रद्द करण्याच्या निर्णयाला काही नागरिकांनी विरोध दर्शवला. परंतु, तरुण निर्णयावर ठाम होते. त्यांनी गावातील ज्येष्ठांना दुष्काळाविषयी समजावून सागितले. जत्रा रद्द करून गायरानात लोकवर्गणीतूनतळे तयार केले. (वार्ताहर)गावात सगळ्या सुविधा आहेत. गावातील तरुण सुशिक्षित आहेत. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे गावात मुलांची लग्नही जमत नव्हती. दुसऱ्या गावातील नागरिक गावात मुलगी देण्यास टाळाटाळ करत होते. भविष्यात पवना धरणातील जलसाठ्यात घट झाली, तरी गावाला पावसाळा येईपर्यंत या तळ्यातून पाणी वापरता येऊ शकते, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जत्रेच्या निमित्त मोठमोठे फ्लेक्स, मनोरंजनाचे कार्यक्रम, जाहिरातबाजीवरील पैशांची उधळण थांबवून एका विधायक कामासाठी गावातील तरुणांनी जत्रा रद्द करून पिण्याच्या पाण्यासाठी तलाव खोदला. याचे मावळातील इतर गावांकडून कौतुक होत आहे.गावाच्या जत्रेची परंपरा शेकडो वर्षांची आहे. पण, पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट पाहून गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यास पुन्हा महिलांना पायपीट करावी लागेल. म्हणून जत्रा रद्द करून त्या पैशांचा उपयोग पाण्यासाठी करायचा, असा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. गावाची जत्रा चालू असताना घरातील महिलांना जत्रेत येता येत नाही. घरात पाहुणे असल्यामुळे त्यांचा संपूर्ण वेळ पाणी भरण्यातच जातो. त्यामुळे पहिले पाणी, मग जत्रा, असे माजी सरपंच सुनील ओव्हाळ यांनी सांगितले.