शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

परीक्षा विभागाचे पहिले पाढे पंचावन्न?

By admin | Updated: March 27, 2015 00:25 IST

मूळ निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळणे, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येणे अशा विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

पुणे : पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा लागणे, मूळ निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळणे, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येणे अशा विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पूर्णवेळ नियंत्रक मिळूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. परिणामी विद्यापीठावर ‘पहिले पाढे पंचावन्न’ म्हणायची वेळ आहे का ? अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठाचा परीक्षा विभाग चर्चेत नव्हता. परंतु, डॉ. अशोक चव्हाण यांनी परीक्षा नियंत्रकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही कालावधीतच पुन्हा एकदा परीक्षा विभाग चर्चेत येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यापूर्वी चव्हाण यांना कामकाजात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) मिळण्यासाठी अर्ज केला आहे. परंतु, अद्याप त्यांना झेरॉक्स कॉपी मिळालेल्या नाहीत. उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळाल्याशिवाय पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षा विभागाने उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचे काम आऊट सोर्स केले आहे. परंतु, काही कारणास्तव सुमारे २२ दिवस उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचे काम बंद ठेवले होते. परिणामी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या प्रती वेळेत मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना वेळेत उत्तरपत्रिका मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यापीठाने काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल आॅनलाईन जाहीर केले आहेत. परंतु, बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अर्जात काही चुका होत्या. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.अभियांत्रिकी विषय वगळता बहुतांश सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची प्रक्रिया प्रगतिपथावर असून, वेळेत निकाल देण्याबाबत परीक्षा विभागातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या ५ मे पासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना उत्तपत्रिकांची झेरॉक्स व पुनर्मूल्यांकनाचा निकाल दिला जाईल. आवश्यकता भासल्यास झेरॉक्स मशिन व परीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. - डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ