शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

प्रथम रस्ता पूर्ण करा; त्यानंतरच टोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 02:01 IST

खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व विविध गावातील नागरिकांनी व्यक्त केली.

नारायणगाव - खेड ते सिन्नर बाह्यवळणासाठी कोणतेही भूसंपादन बाकी नसताना बाह्यवळणाचा रस्ता अपूर्ण का आहे? प्रथम रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच टोल आकारणी करावी. येत्या १५ जुलै रोजी टोल बंद केला जाईल, याशिवाय रस्त्याच्या प्रलंबित कामांना गती येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी व विविध गावातील नागरिकांनी व्यक्त केली़दरम्यान, संपादित जमिनींच्या तक्रारी संदर्भात दर गुरुवारी नारायणगाव येथे मंडलाधिकारी कार्यालयात ११ ते ३ या वेळेत भूसंपादनाचे अधिकारी उपस्थित राहून बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा आढावा घेतील, असे आश्वासन भूसंपादन विभाग क्ऱ १३ च्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व समन्वयिका उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्रकार यांनी नारायणगाव येथे दिले़राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने येत्या १५ जुलै रोजी चाळकवाडी टोलनाका बंद करून आंदोलन करण्याचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हाधिकारी यांना मागील आठवड्यात देण्यात आले होते़ त्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन न करता समन्वयातून प्रश्न सोडवावा यासाठी दोन वेळा समन्वय बैठक घेण्यात आली होती़ मंगळवारी १० जुलै रोजी दुसरी बैठक कुकडी पाटबंधारे विभागातील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत भोरवाडी, नारायणगाव, वारूळवाडी, पिंपळवंडी, भटकळवाडी व आळेफाटा येथील प्रलंबित बाह्यवळण संदर्भातील शेतकºयांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यात आल्या़जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी भूसंपादन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, पोलीस प्रशासन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती़ यावेळी युवा नेते अतुल बेनके, जि़ प़ सदस्य शरद लेंडे, तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, भूसंपादन विभाग क्ऱ १३ च्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी व समन्वयिका उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्रकार, जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी़ आर. उगले, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मोहित ढमाले, कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, आदिवासी नेते मारुती वायाळ, सरपंच विक्रम भोर, अमित बेनके, संजय वारुळे, राजेश बेनके, रघुनाथ लेंडे, सोपान लेंडे आदी मान्यवर व भूसंपादित शेतकरी उपस्थित होते़यावेळी बोलताना चंद्रकार म्हणाल्या, की शासनाने शेतकºयांना रेडी रेकनरनुसार जमिनीला बाजारभाव दिलेले आहेत़ बाधित शेतकºयांचे सरकारकडून जमिनींचा मोबदला येणे असेल, त्या शेतकºयांना येत्या दहा दिवसांत मोदबला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल़ ज्या शेतकºयांचा कोर्टात मोबदला जमा करण्यात आला होता़ ती रक्कम पुन्हा शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे़ लवकरच ती रक्कम अदा करण्यात येईल़ नागरिकांच्या सर्व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे माहिती देवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़रेश्मा माळी म्हणाल्या, की या बैठकीत नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार पुणे येथील भूसंपादन कार्यालयातून नारायणगाव येथील मंडलाधिकारी कार्यालयात दर गुरुवारी ११ ते ३ या वेळेत येऊन लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करावी़ तसेच कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सादर कराव्यात़ दोन महिन्यांसाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी नारायणगाव येथे उपलब्ध राहतील़ यावेळी अतुल बेनके म्हणाले, की रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरू होऊ देणार नाही़ महामार्गाचे संपूर्ण काम झाले नाही़ सब ठेकेदार व्ही़ एम. मातेरे पळून जाण्याचे कारण काय? याची उत्तरे द्यावीत. शासनाने स्वत:हून टोल बंद करून जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये़रघुनाथ लेंडे यांनी पिंपळवंडी व भटकळवाडी येथे शेतकºयांच्या चुकीच्या पद्धतीने रस्त्यासाठी जागा संपादित केली आहे़ ज्या शेतकºयांची जागा संपादित केली आहे, त्या शेतकºयांच्या गटातील इतर शेतकºयांच्या सातबारावरही अतिरिक्त भूसंपादन दाखविण्यात आले आहे. महामार्गालगतच्या जागांना सरकारने २०१३ ला प्रतिगुंठा ४८ हजार रुपये हा दिलेला बाजारभाव अन्यायकारक आहे़वरुण भुजबळ यांनी सांगितले, की कागदपत्रांची पूर्तता करूनही जागेचे निकाल प्रलंबित आहेत़ नारायणगाव व वारूळवाडी शेजारी असूनही नारायणगाव येथील शेतकºयांना जास्त दर व वारूळवाडी येथील शेतकºयांना कमी दर देण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाहीया बैठकीत मुकेश वाजगे हा तरुण भावनाविवश झाला़ वडिलांना उपचारासाठी पुणे येथे नेत असताना वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ वाहतूककोंडीमुळे अनेक घडना घडत आहेत़ आमच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही़ टोल बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे, असे मत त्याने व्यक्त केले़या समन्वय बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना समन्वय अधिकारी यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने येत्या १५ जुलैला टोलनाका बंद करण्यात येईल, असे अतुल बेनके यांनी जाहीर केले़ या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार संघटना, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटना, आळे ग्रामस्थ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे़उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी या बैठकीचे नियोजनकेले होते़ मात्र बैठक सुरू होताच देशमुख हे बैठकीतून निघून गेल्याने तसेच या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर उपस्थित न राहिल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली़आळे ग्रामपंचायतीचे ग्रा़ प़ं सदस्य धनंजय काळे , येडगावचे सरपंच देविदास भोर, सतेज भुजबळ, अशोक घोडके, सुरज वाजगे, मुकेश वाजगे, राजेश बेनके, धनंजय काळे, बाळासाहेब खिल्लारी, मोहित ढमाले, सोपान लेंडे आदींनी आपल्या समस्या या बैठकीत मांडल्या़- विक्रम भोर, सरपंच, कांदळी गाव

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या