शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

नऱ्हेत भांडणातून तरुणांचा गोळीबार

By admin | Updated: March 21, 2016 01:00 IST

नातेवाइकांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तीन मुजोर तरुणांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

पुणे : नातेवाइकांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तीन मुजोर तरुणांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. एका पादचाऱ्याच्या जबड्यामधून घुसलेली गोळी हनुवटीमधून बाहेर आली, तर तेथून जात असलेल्या एका महिलेच्या दंडामध्ये एक गोळी लागली. तर हल्लेखोरांचा नातेवाईक मनगटामध्ये गोळी लागल्याने जखमी झाला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, ही घटना शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.विनायक शिवाजी रानवडे (वय २२), ऋषीकेश श्रीरंग रानवडे (वय १९), सूरज दिलीप रानवडे (वय २२, रा. भैरवनाथ मंदिरामागे, नऱ्हेगाव, ता. हवेली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक अशोक वाल्हेकर (वय ३६, रा. विश्वकृपा, भैरवनाथ मंदिरामागे, नऱ्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींच्या हल्ल्यात वाल्हेकर यांच्यासह दत्तात्रय गंगाराम कांबळे (वय ३३, रा. नऱ्हेगाव, मूळ रा. सुगाव, देगलूर, जि. लातूर) आणि संगीता उत्तम वाघ (वय ३०, रा. नऱ्हेगाव) हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते एकाच भागात राहण्यास असून, सर्वांचा बांधकाम व्यवसाय आहे. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास आरोपी अनिकेत वाल्हेकर याला मारहाण करीत होते. त्या वेळी दीपक यांना त्यांचा चुलतभाऊ ऋषीकेश राजेंद्र वाल्हेकर याने फोन करून अनिकेतला मारहाण होत असल्याचे सांगितले. त्यानुसार दीपक अन्य भावंडांसह घटनास्थळी मदतीसाठी पोचले. आरोपी सूरज याला मारहाणीचा जाब विचारताच त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. घरामध्ये पळालेला सूरज काही कळायच्या आतच गावठी पिस्तूल घेऊन बाहेर आला. रागाच्या भरात त्याने दीपक यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटामध्ये घुसली. तोपर्यंत घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. विनायक रानवडे याने दहशत निर्माण करण्यासाठी आणखी दोन गोळ्या लोकांच्या दिशेने झाडल्या. रस्त्याने पायी घराकडे जात असलेल्या दत्तात्रय कांबळे यांच्या जबड्यात एक गोळी घुसून हनुवटीमधून आरपार बाहेर आली, तर दुसरी गोळी संगीता वाघ यांच्या डाव्या हाताच्या दंडाला लागली आहे.जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असून, या मुजोर तरुणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक जगताप यांनी सांगितले़गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती उशिरा मिळाली. माहिती मिळताच उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप, निरीक्षक (गुन्हे) नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. रविवारी पहाटेपर्यंत सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी ग्राह्य धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोट्ये यांनी २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.