शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

...अखेर जनाई उपसातून पाणी सोडले!

By admin | Updated: April 22, 2015 05:31 IST

जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी

सुपे : जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जनाई योजनेचे उपअभियंता आर. एन. सालगुडे यांनी दिली.सुपे (ता. बारामती) तलावातंर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची मागील दोन महिन्यांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. तसेच, येथील शेतकऱ्यांनी आगाऊ पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे सुपूर्त केली होती. त्यानुसार या तलावात पाणी सोडण्यात येत आहे. सुपे तलावात पाणीसाठा राहिला नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते. येथील शासकीय विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली होती.येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवत होत्या. त्यामुळे येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत होते. येथील शासकीय विहिरींनाजच्या ओढ्याद्वारे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे यांनी दिली.सध्या वरवंड तलावात ७० ते ८० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे त्याच दाबाने पुढे उपसा करण्यात येत आहे. (वार्ताहर)