शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कचरा प्रश्नावर अखेर आराखडा

By admin | Updated: May 24, 2017 04:36 IST

शहरामध्ये जमा होणार कचऱ्याचे जागेवरच शंभर टक्के वर्गीकरण करणे, संकलन करणे आणि प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभे करून शहराचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरामध्ये जमा होणार कचऱ्याचे जागेवरच शंभर टक्के वर्गीकरण करणे, संकलन करणे आणि प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभे करून शहराचा कचरा शहरामध्येच जिरवण्यावर आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे. शहराचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अल्प व दीर्घकालीन आराखडा तयार केला आहे. महापौर मुक्ता टिळक यांची मंजुरी मिळाल्यानंतर हा आरखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. यामुळे तब्बल २१ दिवस शहरातील कचऱ्याची एकही गाडी उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर येऊ दिली नाही. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ग्रामस्थांची भेट घेतली, तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाने एक महिन्याच्या आत कचरा प्रश्नावर कृती आराखडा तयार करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होेते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा आराखडा तयार केला आहे. यामध्ये अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात चालू वर्षासह सन २०१९ ते २०१५ पर्यंत विविध उपाययोजना करण्याचे नियोजन आराखड्यात करण्यात आले आहे.आराखड्यात प्रामुख्याने लोकांचा सहभाग वाढवून विविध उपाययोजना करण्यात येणार असून, त्यात नागरिकांसाठी दहा कलमी कार्यक्रम आखला आहे. तसेच ई-कचरा, राडारोड्याच्या तक्रारींसाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ची निर्मिती करण्यात येणार आहे. भूभरावाच्या जमिनींचे पुनर्जीवन, त्याकरिता दोन हजार क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प नियोजित केला आहे. भूभरावाच्या जमिनींचा पुन्हा वापर करता येईल, असेही आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.