शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

पेरण्यांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 23, 2015 03:21 IST

मागील दोन दिवसांपासून नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे

सोमेश्वरनगर : मागील दोन दिवसांपासून नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवार (दि. २२) अखेर नीरा देवघर धरणक्षेत्रात ३०७ मिमी, भाटघर धरणक्षेत्रात २०६ मिमी, तर वीर धरणक्षेत्रात ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्याने खरिपाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पावसामुळे नीरा देवघर धरणात ९.३६ टक्के, भाटघर धरणात ९.७३ टक्के, तर वीर धरणात ११.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा असाच जोर राहिला, तर तीनही धरणे लवकरच भरतील, अशी माहिती पाटबंधारे खात्याचे विभागीय उपअभियंता डी. एम. डुबल यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी असला, तरीही मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. धरणक्षेत्राबरोबरच नीरा खोऱ्यातही संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिरायती भागातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या, तसेच नीरा खोऱ्यातील दि. १ जुलैपासून होणाऱ्या उसाच्या लागणीचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील तूर, सोयाबीन व बाजरीच्या पेरण्या होऊ शकतात, असे आघारकर अनुसंधान केंद्राचे प्रमुख अजित चव्हाण यांनी सांगितले.गेल्या वर्षी जून महिना पूर्ण, तर जुलै महिना निम्मा कोरडा गेला होता. मात्र, या वर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने शेतकरीवर्गात समाधान आहे. गेल्या वर्षी १२ जुलैलाही सर्वच धरणे कोरडी होती. मात्र, या वर्षी जून महिन्यातच धरणांची पातळी वाढू लागली आहे. (वार्ताहर)