शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

पेरण्यांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 23, 2015 03:21 IST

मागील दोन दिवसांपासून नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे

सोमेश्वरनगर : मागील दोन दिवसांपासून नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवार (दि. २२) अखेर नीरा देवघर धरणक्षेत्रात ३०७ मिमी, भाटघर धरणक्षेत्रात २०६ मिमी, तर वीर धरणक्षेत्रात ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्याने खरिपाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पावसामुळे नीरा देवघर धरणात ९.३६ टक्के, भाटघर धरणात ९.७३ टक्के, तर वीर धरणात ११.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा असाच जोर राहिला, तर तीनही धरणे लवकरच भरतील, अशी माहिती पाटबंधारे खात्याचे विभागीय उपअभियंता डी. एम. डुबल यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी असला, तरीही मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. धरणक्षेत्राबरोबरच नीरा खोऱ्यातही संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिरायती भागातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या, तसेच नीरा खोऱ्यातील दि. १ जुलैपासून होणाऱ्या उसाच्या लागणीचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील तूर, सोयाबीन व बाजरीच्या पेरण्या होऊ शकतात, असे आघारकर अनुसंधान केंद्राचे प्रमुख अजित चव्हाण यांनी सांगितले.गेल्या वर्षी जून महिना पूर्ण, तर जुलै महिना निम्मा कोरडा गेला होता. मात्र, या वर्षी पावसाने लवकरच सुरुवात केल्याने शेतकरीवर्गात समाधान आहे. गेल्या वर्षी १२ जुलैलाही सर्वच धरणे कोरडी होती. मात्र, या वर्षी जून महिन्यातच धरणांची पातळी वाढू लागली आहे. (वार्ताहर)