शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

जातीच्या तटबंदीविरुद्ध संघर्ष करा

By admin | Updated: January 28, 2017 01:17 IST

जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे.

पुणे : जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे. त्यामुळे या जातीधर्माच्या तटबंदी फोडण्यासााठी चित्रकार-कलाकारांसह तरुणांनी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. महात्मा फुलेवाड्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाच्या वतीने आयोजित समता मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारच्या तटबंदी या समाजाच्या विकासातल्या अडसर असतात. त्यामुळे जातीच्या नावाने माणसा-माणसांत उभ्या केलेल्या तटबंदी झुगारून देऊन मानवमुक्तीच्या माणूसपणाची लढाई अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी सगळ््यांचीच आहे. अशा प्रकारची तटबंदी तोडण्याचा विचार फुले-शाहू-आंबेडकर यांनी दिला आहे. त्या मार्गाने आपण हा संघर्ष तीव्र केला पाहिजे. कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून जातमुक्त समाजाकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दिला आहे. आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बचावासाठी तुमच्यासोबत आहोत.’’ या वेळी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश जोशी, श्रीधर अंभोरे, प्रा. अंजली मायदेव, प्रा. प्रतिमा परदेशी, बाबासाहेब ललकारे आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने जाती तोडो... माणूस जोडो या संकल्पनेवर आयोजित चित्रप्रदर्शनातील विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुजा जगताप व योगेश भुवड यांच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. अमोल पवार व किसन आडे यांना द्वितीय व चैतन्य खरे व समृद्धी राजेशिर्के यांना तृतीय पारितोषिक मिळाले. शुभम करंजकर याला उत्तेजनार्थ व प्रियांका कोरडे हिचा विशेष पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. चित्रप्रदर्शनात सहभागी उत्कृष्ट मुलींच्या चित्राला बालाजी वाघमारे यांच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रकाश जोशी व श्रीधर अंभोरे यांनीही चित्रकलेच्या दृश्य माध्यमातील रंगरेषांचा अर्थ स्पष्ट करीत चित्राला भाषा, प्रदेशाचे बंधन नसते. त्यातील मुक्तीची आस महत्त्वाची असते, असे सांगितले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अंजली मायदेव यांनी स्वागत केले. गौतम ललकारे यांनी आभार मानले. किसन आडे, अनिता टेकाळे, संजय धावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.