शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या तटबंदीविरुद्ध संघर्ष करा

By admin | Updated: January 28, 2017 01:17 IST

जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे.

पुणे : जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे. त्यामुळे या जातीधर्माच्या तटबंदी फोडण्यासााठी चित्रकार-कलाकारांसह तरुणांनी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. महात्मा फुलेवाड्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाच्या वतीने आयोजित समता मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारच्या तटबंदी या समाजाच्या विकासातल्या अडसर असतात. त्यामुळे जातीच्या नावाने माणसा-माणसांत उभ्या केलेल्या तटबंदी झुगारून देऊन मानवमुक्तीच्या माणूसपणाची लढाई अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी सगळ््यांचीच आहे. अशा प्रकारची तटबंदी तोडण्याचा विचार फुले-शाहू-आंबेडकर यांनी दिला आहे. त्या मार्गाने आपण हा संघर्ष तीव्र केला पाहिजे. कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून जातमुक्त समाजाकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दिला आहे. आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बचावासाठी तुमच्यासोबत आहोत.’’ या वेळी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश जोशी, श्रीधर अंभोरे, प्रा. अंजली मायदेव, प्रा. प्रतिमा परदेशी, बाबासाहेब ललकारे आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने जाती तोडो... माणूस जोडो या संकल्पनेवर आयोजित चित्रप्रदर्शनातील विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुजा जगताप व योगेश भुवड यांच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. अमोल पवार व किसन आडे यांना द्वितीय व चैतन्य खरे व समृद्धी राजेशिर्के यांना तृतीय पारितोषिक मिळाले. शुभम करंजकर याला उत्तेजनार्थ व प्रियांका कोरडे हिचा विशेष पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. चित्रप्रदर्शनात सहभागी उत्कृष्ट मुलींच्या चित्राला बालाजी वाघमारे यांच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रकाश जोशी व श्रीधर अंभोरे यांनीही चित्रकलेच्या दृश्य माध्यमातील रंगरेषांचा अर्थ स्पष्ट करीत चित्राला भाषा, प्रदेशाचे बंधन नसते. त्यातील मुक्तीची आस महत्त्वाची असते, असे सांगितले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अंजली मायदेव यांनी स्वागत केले. गौतम ललकारे यांनी आभार मानले. किसन आडे, अनिता टेकाळे, संजय धावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.