शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

टँकरच्या आकड्याने केली पन्नाशी पार, दुष्काळ होतोय तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:48 IST

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील ३० गावे आणि जवळपास ३२४ वाड्या वस्त्यांवर ५१ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामती तालुक्यात १६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जानेवारी महिन्यातच ही भिषण परिस्थीती असून येत्या काळात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. वाढत्या उष्णतामानाने दुष्काळाची तिव्रताही वाढणार आहे.यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. तर काही ठिकाणी अल्पवृष्ठी झाल्याने या वर्षी दुष्काळाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहेत. सातत्याच्या विसर्गामुळे धरणेही तळ गाठत आहे. यामुळे जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीकरावी लागत आहे. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जानेवारीतच टँकरची संख्या ही ५० च्या वर गेली आहे. सध्या ३० गावे आणि ३२४ गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची, याबाबत प्रशासनातही चिंता वाढू लागली आहे. दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. टंचाईची अनेक कामे मंजुर करण्यात आली असून त्या त्वरित सुरू करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तसेच जिल्हा परिषदेतर्फे ठिकठिकाणी टंचाई आढावाच्या बैठका घेण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यात टँकरची मागणीही वाढली आहे.बारामती, दौंड, इंदापुर पुरंदर आणि शिरूर तालुक्याला दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात बसत आहे. सध्या शिरूर तालुक्यात १७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्या पाठोपाठ बारामती तालुक्यात १६ टॅकर तर दौंड तालुक्यात ७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अजुन पावसासाठी पाच महिने बाकी असून या दरम्यान दुष्काळाची भिषणता वाढणार आहे. भविष्यात टँकरच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.