शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

टँकरच्या आकड्याने केली पन्नाशी पार, दुष्काळ होतोय तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:48 IST

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील ३० गावे आणि जवळपास ३२४ वाड्या वस्त्यांवर ५१ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामती तालुक्यात १६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जानेवारी महिन्यातच ही भिषण परिस्थीती असून येत्या काळात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. वाढत्या उष्णतामानाने दुष्काळाची तिव्रताही वाढणार आहे.यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. तर काही ठिकाणी अल्पवृष्ठी झाल्याने या वर्षी दुष्काळाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहेत. सातत्याच्या विसर्गामुळे धरणेही तळ गाठत आहे. यामुळे जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीकरावी लागत आहे. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जानेवारीतच टँकरची संख्या ही ५० च्या वर गेली आहे. सध्या ३० गावे आणि ३२४ गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची, याबाबत प्रशासनातही चिंता वाढू लागली आहे. दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. टंचाईची अनेक कामे मंजुर करण्यात आली असून त्या त्वरित सुरू करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तसेच जिल्हा परिषदेतर्फे ठिकठिकाणी टंचाई आढावाच्या बैठका घेण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यात टँकरची मागणीही वाढली आहे.बारामती, दौंड, इंदापुर पुरंदर आणि शिरूर तालुक्याला दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात बसत आहे. सध्या शिरूर तालुक्यात १७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्या पाठोपाठ बारामती तालुक्यात १६ टॅकर तर दौंड तालुक्यात ७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अजुन पावसासाठी पाच महिने बाकी असून या दरम्यान दुष्काळाची भिषणता वाढणार आहे. भविष्यात टँकरच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.