शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सलग पाचव्यांदा मावळात भाजपला यश

By admin | Updated: October 20, 2014 00:17 IST

मावळचा गड राखण्यात भाजपला सलग पाचव्यांदा यश आले आहे. बाळा भेगडे यांनी विजय संपादन करून राट्रवादीचे माऊली दाभाडेंचा पराभव केला.

पिंपरी : मावळचा गड राखण्यात भाजपला सलग पाचव्यांदा यश आले आहे. बाळा भेगडे यांनी विजय संपादन करून राट्रवादीचे माऊली दाभाडेंचा पराभव केला. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने मावळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रहावे लागले. युती असताना निवडणुकीस सामोरे गेलेल्या बाळा भेगडे १४ हजार ३१८ मतांनी विजयी झाले होते. तर यंदा युती नसताना दुपटीने म्हणजेच २८ हजार ०१ मतांनी विजयी झाले. मावळ तालुक्यात भाजपचे प्राबल्य आहे. गेली चार पंचवार्षिक भाजपचाच आमदार निवडून येत आहे. यात त्यांना युतीच्या माध्यमातून शिवसेनेची साथ असायची. मात्र, यंदा युती तुटल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्ररित्या निवडणुकीस सामोरे गेले. याचा फायदा राष्ट्रवादी काँगे्रसला फायदा होईल. हे डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांची संख्या अधिक असतानाही राष्ट्रवादीकडून बंडखोरी थोपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यामध्येही यशही आले. माऊली दाभाडे यांच्या रुपाने एकच उमेदवार रिंगणात उतरला. मात्र, राष्ट्रवादीची ताकत असतानाही अंतर्गत गटबाजी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. आपल्यालाच उमेदवारी याची खात्री मनात बाळगून सुरुवातीपासूनच तयारीत असलेल्या बाळा भेगडेंना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला. प्रचार यंत्रणाही सक्षमरित्या राबविली. मोदी लाटेचाही मोठा परिणाम भेगडेंच्या विजयात आहेच. अमित शहा, विनोद तावडे, पंकजा मुंढे यांच्या सभेंचाही चांगला प्रभाव पडला. तळेगावसह तालुक्यातही आरएसएसचा चांगला प्रभाव आहे. याचाही भेगडेंना फायदा झाला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजप बहुमतात आल्यास भेगडेंना मंत्रीपद मिळेल. आणि भेगडेंच्या माध्यमातून तालुक्याला ‘लाल दिवा’ मिळेल या अपेक्षेनेदेखील मतदारांनी भेगडेंना कौल दिला. भेगडेंना ९५ हजार ३१९ मते मिळाली. त्यांनी २८ हजार ०१ मतांनी विजय संपादन केला. राष्ट्रवादीकडून माऊली दाभाडे यांनीही ताकत लावली होती. ६७ हजार ३१८ मते मिळाली. विजयासाठी त्यांना तब्बल २८ हजार मते कमी पडली. उमेदवारी जाहीर होण्यास झालेला उशिर दाभाडेंसाठी नुकसानीचे ठरले. प्रचारासाठी त्यांना कमी वेळ मिळाला. त्यातच त्यांची प्रचारयंत्रणाही कमी पडली. अनुभवी व्यक्तीमत्व आणि राष्ट्रवादीने थोपविलेली बंडखोरी यामुळे यंदा राष्ट्रवादी जागा जिंकणार असे वाटत होते. मात्र, यंदाही राष्ष्टवादी काँगे्रसच्या पदरी निराशाच पडली. मावळात काँगे्रसला मानणारा वर्ग असल्याने किरण गायकवाड यांना यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांना अवघी १७ हजार ६२४ मते मिळाली. तर अनेक वर्षे युतीच्या माध्यमातून एकत्रित लढलेल्या शिवसेनेला अचानकपणे निवडणूक रिंगणात उतरावे लागले. कसलीही तयारीत नसताना निवडणूक लढविणे म्हणजे शिवसेनेसाठी आव्हानात्कम होते. प्रचारास वेळही अपुरा पडला. शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे यांनी केवळ १७ हजार ३८५ मते घेतली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मावळात ताकद कमी झाल्याचे दिसले.गेल्या विधानसभा निवडणुकीत ८ हजार मते घेतलेल्या मनसेने यंदा चार हजारांचा आकडाही पार करता आला नाही. मनसेचे मंगेश वाळुंज यांना तीन हजार ७९२ मते मिळाली. (प्रतिनिधी)