शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सलग पाचव्यांदा मावळात भाजपला यश

By admin | Updated: October 20, 2014 00:17 IST

मावळचा गड राखण्यात भाजपला सलग पाचव्यांदा यश आले आहे. बाळा भेगडे यांनी विजय संपादन करून राट्रवादीचे माऊली दाभाडेंचा पराभव केला.

पिंपरी : मावळचा गड राखण्यात भाजपला सलग पाचव्यांदा यश आले आहे. बाळा भेगडे यांनी विजय संपादन करून राट्रवादीचे माऊली दाभाडेंचा पराभव केला. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने मावळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रहावे लागले. युती असताना निवडणुकीस सामोरे गेलेल्या बाळा भेगडे १४ हजार ३१८ मतांनी विजयी झाले होते. तर यंदा युती नसताना दुपटीने म्हणजेच २८ हजार ०१ मतांनी विजयी झाले. मावळ तालुक्यात भाजपचे प्राबल्य आहे. गेली चार पंचवार्षिक भाजपचाच आमदार निवडून येत आहे. यात त्यांना युतीच्या माध्यमातून शिवसेनेची साथ असायची. मात्र, यंदा युती तुटल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्ररित्या निवडणुकीस सामोरे गेले. याचा फायदा राष्ट्रवादी काँगे्रसला फायदा होईल. हे डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांची संख्या अधिक असतानाही राष्ट्रवादीकडून बंडखोरी थोपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यामध्येही यशही आले. माऊली दाभाडे यांच्या रुपाने एकच उमेदवार रिंगणात उतरला. मात्र, राष्ट्रवादीची ताकत असतानाही अंतर्गत गटबाजी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. आपल्यालाच उमेदवारी याची खात्री मनात बाळगून सुरुवातीपासूनच तयारीत असलेल्या बाळा भेगडेंना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला. प्रचार यंत्रणाही सक्षमरित्या राबविली. मोदी लाटेचाही मोठा परिणाम भेगडेंच्या विजयात आहेच. अमित शहा, विनोद तावडे, पंकजा मुंढे यांच्या सभेंचाही चांगला प्रभाव पडला. तळेगावसह तालुक्यातही आरएसएसचा चांगला प्रभाव आहे. याचाही भेगडेंना फायदा झाला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजप बहुमतात आल्यास भेगडेंना मंत्रीपद मिळेल. आणि भेगडेंच्या माध्यमातून तालुक्याला ‘लाल दिवा’ मिळेल या अपेक्षेनेदेखील मतदारांनी भेगडेंना कौल दिला. भेगडेंना ९५ हजार ३१९ मते मिळाली. त्यांनी २८ हजार ०१ मतांनी विजय संपादन केला. राष्ट्रवादीकडून माऊली दाभाडे यांनीही ताकत लावली होती. ६७ हजार ३१८ मते मिळाली. विजयासाठी त्यांना तब्बल २८ हजार मते कमी पडली. उमेदवारी जाहीर होण्यास झालेला उशिर दाभाडेंसाठी नुकसानीचे ठरले. प्रचारासाठी त्यांना कमी वेळ मिळाला. त्यातच त्यांची प्रचारयंत्रणाही कमी पडली. अनुभवी व्यक्तीमत्व आणि राष्ट्रवादीने थोपविलेली बंडखोरी यामुळे यंदा राष्ट्रवादी जागा जिंकणार असे वाटत होते. मात्र, यंदाही राष्ष्टवादी काँगे्रसच्या पदरी निराशाच पडली. मावळात काँगे्रसला मानणारा वर्ग असल्याने किरण गायकवाड यांना यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांना अवघी १७ हजार ६२४ मते मिळाली. तर अनेक वर्षे युतीच्या माध्यमातून एकत्रित लढलेल्या शिवसेनेला अचानकपणे निवडणूक रिंगणात उतरावे लागले. कसलीही तयारीत नसताना निवडणूक लढविणे म्हणजे शिवसेनेसाठी आव्हानात्कम होते. प्रचारास वेळही अपुरा पडला. शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे यांनी केवळ १७ हजार ३८५ मते घेतली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मावळात ताकद कमी झाल्याचे दिसले.गेल्या विधानसभा निवडणुकीत ८ हजार मते घेतलेल्या मनसेने यंदा चार हजारांचा आकडाही पार करता आला नाही. मनसेचे मंगेश वाळुंज यांना तीन हजार ७९२ मते मिळाली. (प्रतिनिधी)