शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

आताच्या चित्रविचित्र राजकारणाने बेरोजगारी वाढण्याची भीती- रामदास फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 03:14 IST

चिंचवडमध्ये यशवंत-वेणू पुरस्काराचे वितरण सोहळा, भविष्यात गुन्हेगारी वाढणार

पिंपरी : यशवंतराव चव्हाण यांच्या काळामध्ये राजकारण खेळीमेळीचे होते. पक्षांमधील नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. त्यांच्यामध्ये संवादाची भाषा होती. मात्र आताच्या चित्रविचित्र राजकारणामध्ये भविष्य धोक्यात आले आहे. आताचे राजकारण हे वेगळ्याच दिशेने चालले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढेल, असे प्रतिपादन वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहामध्ये यशवंत-वेणू गौरव पुरस्काराचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते फुटाणे व त्यांची पत्नी प्रभावती यांना ‘यशवंत-वेणू पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ घोंगडे यांना यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार, सोमाटणेचे माजी उपसरपंच सचिन मुºहे, युवा उद्योजक कुणाल काकडे यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काल जो एका पक्षाचा नेता होता, तो आज दुसऱ्या पक्षामध्ये सामील होत आहे. सध्या स्वप्न दाखवणाऱ्या राजकारण्यांची गर्दी झाली आहे. त्यांच्या मागे असणारे समर्थक वाढत गेले, तर येत्या काळामध्ये अवघड परिस्थिती निर्माण होईल.- रामदास फुटाणे , वात्रटीकाकारसध्याचे राजकारण आणि माणसे संकुचित होत चालली आहेत. यशवंतरावांच्या ठायी शब्दसामर्थ्य, वक्तृत्व होते. आताच्या राजकारण्यांत तसे फार कमी पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या काळात यशवंतरावांची प्रकर्षाने आठवण होते.- उल्हास पवार, ज्येष्ठ नेते

टॅग्स :ramdas phutaneरामदास फुटाणे