शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

एफआरपीची चिंता, कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:22 IST

साखरेचे दर क्विंटलला २६८० रुपये एवढ्या नीचांकी पातळीवर आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांची एफआरपी कशी भागवायची, याची चिंता लागली असून कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जाण्याची भीती कारखानदार व्यक्त करीत आहेत.

सोमेश्वरनगर : साखरेचे दर क्विंटलला २६८० रुपये एवढ्या नीचांकी पातळीवर आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांची एफआरपी कशी भागवायची, याची चिंता लागली असून कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जाण्याची भीती कारखानदार व्यक्त करीत आहेत.साखर कारखानदारी वाचविण्यासाठी आता केंद्र सरकार सरसावले असून टनाला ५५ रुपये अनुदान देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. साखरेच्या भावातील गेल्या दोन वर्षांतील घसरण झाली असून काही दिवसांत किरकोळ विक्रीचे दरही ३० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. देशात यंदाच्या हंगामात ५३ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. साखरेचे भाव गेल्या दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली. मात्र जागतिक बाजारपेठेतच साखरेला दर नसल्याने त्याचा फारसा फायदा साखर कारखान्यांना झाल्याचे दिसत नाही. साखरेवरील २० टक्के निर्यात कर कमी करूनही काही उपयोग झाला नाही. हा सर्व सरप्लस साठा आता देशांतर्गत बाजारपेठेत येणार असल्याने साखरेचे ठोक भावही पडत आहेत, तर किरकोळ विक्रीतही लवकरच घसरण सुरू होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. साखरेच्या दरातील घसरण सुरूच असल्याने राज्य बँकेने मूल्यांकनही कमी करत ते क्विंटलला २३८० रुपयांवर आणले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना आता एफआरपी देणेही कठीण बनत आहे. काही कारखान्यांनी तर जाहीर केलेल्या ऊस दरातही कपात करण्यास सुरुवात केल्याने साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. सगळेच साखर कारखाने उसाचा भाव कमी करतात की काय, अशी धास्ती ऊस उत्पादकांनी घेतली आहे.>साखरेचे दर ३६०० रुपये क्विंटलपर्यंत घसरलेनोव्हेंबर २०१७ ला बाजारातील साखरेचे दर ३६०० रुपये क्विंटल होते. ते आज २६८० रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखाने पुन्हा एकदा शॉर्ट मार्जिनमध्ये जातात की काय, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन ३० टक्क्यांनी वाढलं आहे. एकट्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी ३०१ लाख टन उसाचं गाळप झालेलं होतं, तर त्या तुलनेत यंदा ५०० लाख टन गाळप झालेलं आहे. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं सध्याचं आयात शुल्क ४० वरून १०० पर्यंत वाढवावं, तसंच जास्तीत जास्त निर्यातीला प्रोत्साहन देऊन देशातील साखर बाहेर पाठवावी, अशी मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ८०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ६०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत.साखरेचे दर ढासळत असल्याने बँकांनी साखरेचे मूल्यांकनही कमी केले आहे. त्यामुळे एफआरपी भागविणे मुश्कील आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातील.- पुरुषोत्तम जगतापअध्यक्ष, सोमेश्वर कारखानापरदेशातील साखरेचे दर चांगले असताना केंद्र सरकारने निर्यातीचे धोरण राबविणे गरजेचे होते. आता निर्णय घेऊन काहीच उपयोग झाला नाही. भविष्यात साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातील. ज्यांच्याकडे उपपदार्थ प्रकल्प आहेत असेच कारखाने तग धरतील.- अशोक पवारअध्यक्ष, घोडगंगा कारखाना२२५० ते २३०० रुपयांनी साखर निर्यात करून २७०० रुपये एफआरपी कशी देणार? ५५ रुपये अनुदान जाहीर केले तरी ते साखर कारखान्यांना फारसे उभारी देणारे नाही. पडणाऱ्या साखरेच्या दरातून कारखानदारी वाचवायची असेल तर इथेनॉलला दर वाढून देण्याची गरज आहे. - रंजन तावरेअध्यक्ष, माळेगाव कारखाना२३८०रुपये उचल राज्य बँक साखर कारखान्यांना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्केप्रमाणे देत आहे. यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊस उत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १८०० रुपयेउरत आहेत.२६४२रुपयांच्या आसपास यावर्षीची एफआरपी असल्याने ऊसउत्पादकांना द्यायची रक्कम व उत्पादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशोब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ८०० रुपये कमी पडल्याने आता ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागवणार, या चिंतेत कारखानदार आहेत.इतर खर्चात काटकसरसध्या साखर हंगाम सुरू आहे. त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करत एफआरपी भागवावी लागली आहे.