शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘अप्पर’सारख्या दुर्घटनेची वारज्यातही भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:15 IST

गणपती माथ्याकडून वारजे उड्डाणपुलाकडे येण्यासाठी उताराचा रस्ता असल्याने, या अरुंद रस्त्यावर एखाद्या मोठ्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास, अप्पर-इंदिरानगरसारखा भयंकर अपघात होऊ शकतो.

सचिन सिंग वारजे : गणपती माथ्याकडून वारजे उड्डाणपुलाकडे येण्यासाठी उताराचा रस्ता असल्याने, या अरुंद रस्त्यावर एखाद्या मोठ्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास, अप्पर-इंदिरानगरसारखा भयंकर अपघात होऊ शकतो.वारजे-माळवाडीमध्ये देखील शहराच्या इतर उपनगरांप्रमाणे अनेक अपघातप्रवण क्षेत्र तयार होत आहेत. रस्त्यावरील फेरीवाले पथारीवाले यांचे अतिक्रमण, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, रस्तारुंदीकरणात महापालिकेकडून होत असलेली अक्षम्य दिरंगाई, नागरिकांकडून रस्त्यावर होणारे बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर झळकणारे बेकायदा फलक व होर्डिंग आदी कारणांमुळे वारजे उपनगरात व आसपासच्या परिसरात अशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.रुंदीकरण रखडलेले : १९९७ मध्ये महापालिकेत समावेश होऊन २० वर्षे झाली, तरी आजही गणपती माथा ते आंबेडकर चौक या दरम्यान मुख्य एनडीए रस्त्याचे रुंदीकरण रखडलेलेच आहे. वरच्या भागात ग्रामीण भागातील नागरीकरण प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यातच आता शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे ही गावे महापालिकेत आल्याने त्याचा वेग अजून वाढणार आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. त्यामुळे गणपती माथा ते वारजे उड्डाणपूल या भागात किमान या टप्प्यात, तरी लवकरात लवकर रुंदीकरण गरजेचे आहे. वारजे-माळवाडी मुख्य बस थांब्यासमोर तर एका बाजूला दोन पीएमपी बस एकाच वेळी जातील, एवढादेखील रस्ता उरत नाही. त्यामुळे येथील रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत गरजेचे आहे.फेरीवाल्यांचे अतिक्रमण : संपूर्ण वारजे, महामार्गाचा भाग, शिवणे, कर्वेनगर मुख्य रस्त्यावर, आतील उपरस्त्यांवरदेखील हमखास ही समस्या पाहायला मिळते. काही ठिकाणी इमारतीमधील दुकानदारांनी आपल्या दुकानसमोरची मोकळी जागा पथारी व्यावसायिकांना भाड्याने देऊन उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण केले आहे. या पथारीवाल्यांनी आपला माल ग्राहकांना दिसावा, यासाठी अधिकाधिक रस्ता अडवला आहे.पथारीवाल्यांची वाढती संख्या : पथारीवाल्यांची वाढती संख्या हे देखील चिंतेचे कारण आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना जकात नाका, माळवाडी बसथांबा, उत्तमनगर येथे दर आठवड्याला एक तरी बेकायदा टपरी उभी राहत आहे. पालिका प्रशासन सर्व ठिकाणी डोळेझाक करून आहे. यात काही वेळेला राजकीय आशीर्वादानेच या टपºया दिमाखात व्यवसाय करत आहेत.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : वारजे उड्डाणपुलाखालीच वाहतूक पोलीस विभागाचे कार्यालय आहे. त्यांच्या अखत्यारित उत्तमनगर ते वनदेवी मंदिर, तसेच महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते चांदणी चौक असा वाहतुकीच्या कामाचा मोठा डोलारा आहे. तरीही त्यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर बेकायदा वाहतूक चालत आहे.पुलापासून कात्रजकडे जाणाºया रस्त्यावर तर अगदी बेकायदा प्रवासी वाहनांनी रस्ता व्यापलेला आहे. तीच गत चांदणी चौकाकडे जाणाºया रस्त्यावर आहे. या मुख्य चौकापासून सर्व बाजूस जाण्यासाठी सहा आसनी व इतर प्रवासी वाहने दिवसभर उभी राहिली तरी कारवाई करण्याठी दुर्लक्ष करण्यात येते.वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून एका नागरिकाने तर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी पोलीस अधिकाºयाच्या डोळ्यात अंजन घालणारे फलक लावले होते. वाहतूक विभागाने ते काढण्याची चपळाई मात्र तत्परतेने दाखविली.नो पार्किंग क्षेत्रातही वाहने : याशिवाय वारजे वाहतूक विभागाकडे बेकायदा पार्किंग करणाºया दुचाकी वाहनांवर कारवाईसाठी खात्याचा कुठलाही टेम्पो नाही. त्यामुळे चारचाकींना जॅमर कारवाई करणारे मर्यादित पोलीस दुचाकीच्या बेकायदा पार्किंगबाबत उदासीन वाटतात. त्यामुळे या सर्व भागात तुम्ही नो पार्किंग क्षेत्रातही वाहने लावून खुशाल फिरू शकता, असे सध्याचे चित्र आहे.

टॅग्स :Accidentअपघात