शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बाप रे बाप, वाढला उन्हाचा ताप!

By admin | Updated: April 21, 2015 03:02 IST

उन्हाचा झळा वाढल्याने आज सोमवारी दुपारी घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले होते. असह्य चटक्याने नागरिक आणि

पिंपरी : उन्हाचा झळा वाढल्याने आज सोमवारी दुपारी घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले होते. असह्य चटक्याने नागरिक आणि वाहनचालक पोळून निघाले. तळपत्या उन्हामुळे रहदारी तुरळक झाली होती, तर काही भागात रस्ते ओस पडले होते. थंड पेय, सरबत पिऊन शरीराची लाही लाही कमी करताना प्रयत्न काहींनी केला. मात्र, त्याचा फारसा फरक पडला नाही. रविवारपासून उन्हाच्या झळा वाढल्या. सकाळपासून वातावरणात गरम वारे वाहत होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा अधिक झाला. बाहेर ऊन अधिक दिसत नव्हते. काहीसे ढगाळ वातावरण होते. मात्र, उन्हाचा झळा असह्य होत्या. पादचारी आणि वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वार, रिक्षा व टेम्पोचालकांना त्याची तीव्रता जाणवली. उन्हाच्या चटक्याने नागरिक अक्षरश: पोळून निघाले. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घामाच्या धारा रुमालाने टिपल्या जात होत्या. घशाला कोरड पडत होती. रस्त्याकडेच्या टपरीवर लिंबाचा रस, लस्सी, उसाचा रस, नीरा, ताक, थंड पेय, नारळ पाणी पिण्यास पसंती दिली जात होती. तसेच, आईस्क्रीम आणि कलिंगड खाल्ले जात होते. त्यामुळे थोडासा दिलासा मिळत होता. मात्र, प्रचंड उकाड्याने थोड्या वेळाने पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीने नागरिक हैराण झाले होते. उन्हाच्या झळ्यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी दुपारी वाहने रस्त्यावर न काढता घरीच किंवा कार्यालयात थांबणे पसंत केले. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक होती. काही रस्ते तर ओस पडले होते. रस्त्याकडेच्या झाड्याच्या सावलीत दुचाकीस्वार थांबून विश्रांती घेत होते. हेल्मेट आणि टोपीतून घामाच्या धारा वाहत होत्या. (प्रतिनिधी)