शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेली शेती फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लोणी काळभोर: शेतकऱ्यांनी ज्ञानाची जोड कृतीला देऊन तंत्रज्ञान आत्मसात केले तरच शेती फायदेशीर होऊ शकते, असे मत कृषी विस्तार ...

लोणी काळभोर: शेतकऱ्यांनी ज्ञानाची जोड कृतीला देऊन तंत्रज्ञान आत्मसात केले तरच शेती फायदेशीर होऊ शकते, असे मत कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.

शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी मोहीम-२०२१ चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विकास पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, हडपसर मंडल कृषी आधिकारी गुलाब कडलग, पुरुषोतम काकडे, मेघराज वाळुंजकर, माजी सरपंच गणेश महाडिक उपस्थित होते.

विकास पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून सरी वरंबा पद्धतीने बियाण्याची पेरणी केली, तर ८ ते १० किलो बियाण्यांची बचत होते. ज्ञान, कृती, तंत्रज्ञान यांच्या साह्याने बियाणे, खते यांची बचत होते. जीवाणू प्रक्रिया केल्यास पिकांवर कीड, रोग पडण्याची शक्यता कमी होते. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या दिवसात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या सर्व आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून शेेेतकऱ्यांनी आपले उत्पादन व उत्पन्न वाढवावेे.

ज्ञानेश्वर बोटे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची कृषी संजीवनी - २०२१ मोहीम २१ जून ते १ जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना देण्याचा उद्देश यामागे आहे. या वेळी माजी सरपंच गणेश महाडिक यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वेळी उत्कृष्ट कर्मचारी कृषी सेवक शंकर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी शेतीनिष्ठ शेतकरी अरुण घुले यांच्या शेतातील फळबाग योजना, गांडूळखत प्रकल्प, ठिबक सिंचन, पाला पाचोळ्या पासून सेंद्रिय खत या उपक्रमांची पाहणी करण्यात आली.