शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेली शेती फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लोणी काळभोर: शेतकऱ्यांनी ज्ञानाची जोड कृतीला देऊन तंत्रज्ञान आत्मसात केले तरच शेती फायदेशीर होऊ शकते, असे मत कृषी विस्तार ...

लोणी काळभोर: शेतकऱ्यांनी ज्ञानाची जोड कृतीला देऊन तंत्रज्ञान आत्मसात केले तरच शेती फायदेशीर होऊ शकते, असे मत कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी व्यक्त केले.

शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी मोहीम-२०२१ चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विकास पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, हडपसर मंडल कृषी आधिकारी गुलाब कडलग, पुरुषोतम काकडे, मेघराज वाळुंजकर, माजी सरपंच गणेश महाडिक उपस्थित होते.

विकास पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून सरी वरंबा पद्धतीने बियाण्याची पेरणी केली, तर ८ ते १० किलो बियाण्यांची बचत होते. ज्ञान, कृती, तंत्रज्ञान यांच्या साह्याने बियाणे, खते यांची बचत होते. जीवाणू प्रक्रिया केल्यास पिकांवर कीड, रोग पडण्याची शक्यता कमी होते. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या दिवसात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या सर्व आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून शेेेतकऱ्यांनी आपले उत्पादन व उत्पन्न वाढवावेे.

ज्ञानेश्वर बोटे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाची कृषी संजीवनी - २०२१ मोहीम २१ जून ते १ जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना देण्याचा उद्देश यामागे आहे. या वेळी माजी सरपंच गणेश महाडिक यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वेळी उत्कृष्ट कर्मचारी कृषी सेवक शंकर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी शेतीनिष्ठ शेतकरी अरुण घुले यांच्या शेतातील फळबाग योजना, गांडूळखत प्रकल्प, ठिबक सिंचन, पाला पाचोळ्या पासून सेंद्रिय खत या उपक्रमांची पाहणी करण्यात आली.