शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीतच अडकलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

-- भोर : भोर तालुक्यातील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे कृषी लागवड क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी निर्सगाचा ...

--

भोर : भोर तालुक्यातील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे कृषी लागवड क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी निर्सगाचा लहरीपणा, पाण्याचा अभाव व अर्थिक परिस्थितीमुळे पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीत अडकलेला आहे. याउलट पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस पारंपरिक पद्धत सोडून यंत्राचा वापर करताना दिसत असून शेतीत बदल करून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसत आहे.

तालुक्यातील प्रमुख पिके भात असले तरी सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

भोर तालुक्यात १९७ गावे असून तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८६७७६ हेक्टर असून १५५ खरिपाची तर ४२ गावे रब्बीची आहेत. पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर तर रब्बी पिकाखालील क्षेत्र १७४०० हेक्टर आहे. तालुक्यात अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. भात हे प्रमुख पीक असुन ७४०० हेक्टवर भाताची लागवड केली जाते. त्यासाठी यावर्षी सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर भातरोपे वाटिकाची पेरणी करण्यात येणार आहे. भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. निसर्गाचा लहरीपणा, पाण्याचा अभाव व आर्थिक परिस्थिती यामुळे पश्चिम भागातील शेतकरी भात नाचणी वरई ही जिरायती शेती करतात. मात्र पाऊस पडला तर शेती पिकते अन्यथा उपासमार अशी अवस्था आहे.

या उलट पूर्व भागातील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग परिसर व भोंगवली पट्टा या भागात नवनवीन यंत्राचा वापर करून आधुनिक पद्धतीने बागायती शेती केली जाते. या शिवाय पाॅलीहाऊसचा वापर करूनही शेती करतात. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा येथील शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. तालुक्यात भाताबरोबरच सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असून नसरापूर,उत्रोली, खानापूर, हातनोशी, भाबवडी, पिसावरे, नांदगाव, देगाव, नायगाव, कुरंगवडी यासह अनेक भागात ३ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. कृषी विभागामार्फत उत्पन्नवाढीसाठी रुंदसरी ओरंभा या पद्धतीचा आणि सुधारीत वाणाचा वापर केला जातो. खरीप भुईमूगदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सुमारे ४ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. पूर्व भागात ऊस, टोमॅटो, वांगी, भेंडी, काकडी, भाजीपाला ही पिके घेतली जातात. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यापासून आर्थिक फायदा मिळत आहे

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी संकरीत आधुनिक पद्धतीने यंत्राच्या साह्याने भात लागवड तंत्रज्ञानाचा देखील प्रकल्प माळेगाव, हातवे तांबड, आळंदी, नाटंबी आदी भागात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येतो दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे.

चारसूत्री पद्धतीने वाताला करंजी बुद्रुक, खानापूर, रावडी, जयतपाड गृहिणी, आपटी आदी अनेक गावातील शेतकरी भाताची लागवड करतात तालुक्यातील ग्रामीण भागात पाच लागवड करण्यासाठी मजुरांऐवजी यंत्राच्या मदतीने चिखलणी लागवड केली जाते यात वाढ होत आहे. यामुळे मजुरांचा खर्च कमी होतो आणी उत्पन्न अधिक मिळत असल्यामुळे यंत्राचा वापर वाढला आहे. तालुक्यात पश्चिम भागात भाताची पेरणी पूर्ण होत आली असून पूर्व भागातील शेतकरी पेरणीला सुरुवात करत आहेत.