शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:46 IST

मागील अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या बारामती - फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. आता भूसंपादनाची प्रक्रिया

- लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : मागील अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या बारामती - फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, बारामती तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी चक्क रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या छायाचित्रासमोर आरती करून ‘आता तुम्हीच शेतकऱ्यांचे ‘प्रभू’ आहात,’ असे म्हणून साकडे घातले. बारामती तालुक्यातील शेतकरी रेल्वे भूसंपादनाच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. शासन बारामती फलटण रेल्वेमार्ग जिरायती आणि बागायती भागातून जात आहे. त्यामुळे १३ गावांतील १७० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून बारामती देशाच्या नकाशावर येणार आहे. त्याचबरोबर दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. लोणंद - फलटण मार्गाचे काम मार्गी लागले. मात्र, सुरुवातीपासूनच बारामतीतून या मार्गाला विरोध झाला. त्यामुळे जिरायती भागातून मार्ग नेण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेल्वेने महसूल खात्याकडे भूसंपादनासाठी निधीदेखील वर्ग केल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. त्यानंतर या भूसंपादन होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी आज मध्यवर्ती प्रशासकीय भवनासमोर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी चक्क रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हेच आता खरे प्रभू आहेत, असे समजून त्यांची आरती केली आणि तू सुखकर्ता तू दु:खहर्ता ही आरती केली. आमच्यावर आलेले संकट ‘प्रभू’ तुम्हीच दूर करा, असे साकडे घातले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा होती. बारामती तालुक्याच्या जिरायत भागासह पश्चिम भागातून जाणाऱ्या बारामती-फलटण रेल्वेमार्गासाठी येत्या दोन दिवसात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध करत आज बारामती येथील प्रशासकीय भवनासमोर अनोखं आंदोलन केलं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रतिमेची आरती करत शेतकऱ्यांनी या रेल्वेमार्गासाठी शासनानं पर्यायी जागा वापरण्याची आग्रही मागणी केली. भूसंपादनासाठी नव्या कायद्याने मोबदला...बारामती - फलटण रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडला आहे. या मार्गासाठी नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या कुटुंबातील एकाला रेल्वेत नोकरीस घ्यावे, यासाठी प्रयत्न राहणार आहेत, असे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भूसंपादनाचा १०० कोटींचा निधी वर्ग झाला आहे. आणखी ५० कोटी रुपयेदेखील तत्काळ उपलब्ध होणार आहेत. मार्गाचा बहुतेक भाग जिरायती ‘आता नाही, तर कधीच नाही,’ अशी स्थिती रेल्वे मार्गाची आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक आहे. विरोध नसेल तर ६ महिन्यांत भूसंपादनाचा विषय मार्गी लागणार असल्याचे प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले. बागायती जमिनी देण्यास विरोध...बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागायती जमिनी देण्यास विरोध आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीशेजारी शासकीय जमिनीतून रेल्वे मार्ग काढवा, अशी आग्रही मागणी असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी सांगितले.