शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब बागायतदारांची दलालांकडून लुबाडणूक, बारामती, इंदापूरच्या शेतक-यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:05 IST

डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत.

बारामती : डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत. याचा फटका बारामती, इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांना बसला आहे.बारामती, इंदापूर तालुक्यांतील जिरायती-बागायत पट्ट्यात हक्काची फळबाग म्हणून डाळिंब बागांकडे पाहिले जाते. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणूनही डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मात्र कष्टाने पिकविलेले फळ बाजार समितीमध्ये अक्षरश: दलालांच्या घशात घालावे लागत आहे. शेतकºयाने बाजार समितीच्या आवारात माल आणला, की दलाल चांगल्या गुणवत्तेच्या मालाच्या सहा प्रकारात वर्गवारी करतो. ही वर्गवारी शेतकºयांच्या खर्चाने केली जाते. तत्पूर्वी दलाल ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमधील कॅरेटमधून स्वत:च्या कॅरेटमध्ये माल उतरवून घेतो. या उतरवणुकीचे भाडेदेखील शेतकºयांच्या माथी मारले जाते. तसेच दलाल स्वत:च्या कॅरेटचे भाडेदेखील शेतकºयांकडून हमाली, तोलाई, भराईमध्ये ही रक्कम वसूल केली जाते.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाचे बाजार९५ रुपयांपर्यंत होते. मात्र अवघ्या २० दिवसांतच डाळिंबाचे बाजार सरासरी २० ते २४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.चांगल्या गुणवत्तेच्या फळांची सहा प्रकारात वर्गवारी केली जाते. या वर्गवारीच्या प्रकारावरदेखील डाळिंब बागायतदारांनी शंका व्यक्त केली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये मालाची फक्त तीन प्रकारांत वर्गवारी केली जाते. मग पुणे बाजार समितीमध्ये सहा प्रकारांत वर्गवारी का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला आहे. ही वर्गवारी नेमकी कोणत्या आधारावर केली जाते याची उत्तरे दलाल शेतकºयांना देत नाही. साधारण एका एकर डाळिंब बागेसाठी १ लाखाच्या आसपासखर्च येतो. महिन्याच्या सुरुवातीला असणारा दर आता जवळपास ७० ते ८० टक्क्यांनी उतरल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चदेखील निघेनासा झाला आहे.बाजार पाडण्यासाठी अजब कारणे...बाजार उतरण्याची अजब कारणे दलाल शेतकºयांना देत आहेत. मध्यंतरी धुराच्या ढगामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण खराब झाले होते. याचा फायदा घेत पुण्यातील दलाल, व्यापाºयांनी दिल्लीत जास्त धुके पडल्याने बाजार उतरले असल्याचे हास्यास्पद कारण दिले होते.मात्र बाजार समितीमध्ये येणारी संपूर्ण आवक व्यापारी मातीमोलकिमतीने खरेदी करीत होते. मात्र किरकोळ विक्रीचे बाजार मात्र अजूनही चढेच राहिले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यापारी व दलाल बाजार पाडण्यासाठी फालतू कारणे देत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी