शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

डाळिंब बागायतदारांची दलालांकडून लुबाडणूक, बारामती, इंदापूरच्या शेतक-यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:05 IST

डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत.

बारामती : डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत. याचा फटका बारामती, इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांना बसला आहे.बारामती, इंदापूर तालुक्यांतील जिरायती-बागायत पट्ट्यात हक्काची फळबाग म्हणून डाळिंब बागांकडे पाहिले जाते. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणूनही डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मात्र कष्टाने पिकविलेले फळ बाजार समितीमध्ये अक्षरश: दलालांच्या घशात घालावे लागत आहे. शेतकºयाने बाजार समितीच्या आवारात माल आणला, की दलाल चांगल्या गुणवत्तेच्या मालाच्या सहा प्रकारात वर्गवारी करतो. ही वर्गवारी शेतकºयांच्या खर्चाने केली जाते. तत्पूर्वी दलाल ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमधील कॅरेटमधून स्वत:च्या कॅरेटमध्ये माल उतरवून घेतो. या उतरवणुकीचे भाडेदेखील शेतकºयांच्या माथी मारले जाते. तसेच दलाल स्वत:च्या कॅरेटचे भाडेदेखील शेतकºयांकडून हमाली, तोलाई, भराईमध्ये ही रक्कम वसूल केली जाते.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाचे बाजार९५ रुपयांपर्यंत होते. मात्र अवघ्या २० दिवसांतच डाळिंबाचे बाजार सरासरी २० ते २४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.चांगल्या गुणवत्तेच्या फळांची सहा प्रकारात वर्गवारी केली जाते. या वर्गवारीच्या प्रकारावरदेखील डाळिंब बागायतदारांनी शंका व्यक्त केली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये मालाची फक्त तीन प्रकारांत वर्गवारी केली जाते. मग पुणे बाजार समितीमध्ये सहा प्रकारांत वर्गवारी का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला आहे. ही वर्गवारी नेमकी कोणत्या आधारावर केली जाते याची उत्तरे दलाल शेतकºयांना देत नाही. साधारण एका एकर डाळिंब बागेसाठी १ लाखाच्या आसपासखर्च येतो. महिन्याच्या सुरुवातीला असणारा दर आता जवळपास ७० ते ८० टक्क्यांनी उतरल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चदेखील निघेनासा झाला आहे.बाजार पाडण्यासाठी अजब कारणे...बाजार उतरण्याची अजब कारणे दलाल शेतकºयांना देत आहेत. मध्यंतरी धुराच्या ढगामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण खराब झाले होते. याचा फायदा घेत पुण्यातील दलाल, व्यापाºयांनी दिल्लीत जास्त धुके पडल्याने बाजार उतरले असल्याचे हास्यास्पद कारण दिले होते.मात्र बाजार समितीमध्ये येणारी संपूर्ण आवक व्यापारी मातीमोलकिमतीने खरेदी करीत होते. मात्र किरकोळ विक्रीचे बाजार मात्र अजूनही चढेच राहिले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यापारी व दलाल बाजार पाडण्यासाठी फालतू कारणे देत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी