शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

उसाचे दर उतरल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: January 13, 2017 01:54 IST

साखर कारखान्याचे गळीत हांगाम संपताच गुऱ्हाळ चालकांनी उसाचे दर उतरविल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जोपर्यंत

राहू : साखर कारखान्याचे गळीत हांगाम संपताच गुऱ्हाळ चालकांनी उसाचे दर उतरविल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जोपर्यंत अनुराज शुगर व श्रीनाथ म्हस्कोबा या दोन खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू होता तोपर्यंत गुऱ्हाळ चालकांनी उसाला तीन हजार शंभर रुपय प्रतिटन दर दिला होता. परंतु दि.९ रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद होतो ना होतो, तोच गुऱ्हाळ चालकांनी सर्व गुऱ्हाळचालक, ऊस वाहतूक व ऊस खरेदीदारांची बैठक घेऊन हा दर तब्बल अठ्ठाविशे रुपये करून प्रतिटन तीनशे रुपये इतका फटका शेतकऱ्यांना दिला आहे. अपुऱ्या उसामुळे साखर कारखाने बंद झाल्यावर उसाला गुऱ्हाळ चालकांकडून चांगला दर मिळेल म्हणून राहू बेट परिसरातील शेतकऱ्यांनी एक लाख टनाच्या जवळपास ऊस साखर कारखान्यांना न देता राखून ठेवला आहे. अनुराज शुगरने १ लाख ११ हजार २२२ टन गाळप, तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने १ कोटी ९२ लाख ९११ टन गाळप पूर्ण केले आहे. परंतु राहू बेट परिसारात शिल्लक उसाचा प्रश्न पडलेल्या दरामुळे अडचणीचा ठरणार आहे. कोरेगावभिवर येथील शेतकरी बन्सिलाल फडतरे म्हणाले, ‘‘गुऱ्हाळ चालकांकडून अशी अडवणूक होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. साखर कारखाने चालू असेपर्यंत हे गुऱ्हाळ चालक ऊस शिल्लक राहावा म्हणून साखर कारखान्यापेक्षा जादा दर देतात व साखर कारखान्याचा हांगाम संपला की, युनिअन करून दर खाली आणतात व मग यामधून शेतकऱ्यांची फसवणूक होते. जर गुऱ्हाळ चालक शेतकऱ्यांची अडवणूक करणार असतील तर हे आम्ही सहन करणार नाही. या विरोधात कायदेशीर लढा उभा करू.’’ (वार्ताहर)