शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शेतक-यांना ‘हायटेन्शन’चा झटका!

By admin | Updated: February 22, 2015 22:57 IST

कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तर विद्युत कंपनीचे अधिकाऱ्यांनी विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच जबाबदारी स्पष्ट होईल, असे सांगितले. आज दुपारी दीडच्या सुमारास डिंंग्रजवाडी गावच्या हद्दीत वीज पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वीजवाहिन्यांखाली असणाऱ्या उसाला वाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली. क्षणात आगीचे डोंब उच्च क्षमतेच्या तारांच्या उंचीपेक्षाही वरती गेले होते. या क्षेत्राच्या शेजारीच ऊसतोड करणाऱ्या मजुरांनी व शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारचे कडक ऊन व सोसाट्याचा वारा यामुळे आगीने मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्यापून टाकले होते. आग आटोक्यात आणणे शक्य होत नसल्याने व त्यात वीजपुरवठाही खंडित झाल्याने वीजपंप चालू होत नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याचे माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे यांनी सांगितले.या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना व रांजणगाव, शिरूर येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. दरम्यान, आगीला वाऱ्याची साथ मिळाल्याने आग पूर्वेकडून पश्चिमेकडे जात डिंंग्रजवाडी हद्दीतून कोरेगाव हद्दीतील उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. आगीच्या भक्ष्यस्थानी उसाचे फडच्या फड शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खाक झाले. उसाच्या फडातील काही ऊस तोडून आग रोखण्याचा प्रयत्न कोरेगावातील हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष कचरू ढेरंगे यांच्या पुढाकाराने काही शेतकऱ्यांनी केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे फ ड व इतर पिके आगीच्या तडाख्यातून वाचवण्यात यश आले. दरम्यान, अग्निशमन यंत्रणा मात्र जळीत क्षेत्रापर्यंत पोहोचू शकलीच नाही. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीजवाहिन्यांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळेच आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असले तरीही नेमकी आग उच्च दाब वाहिनीमुळे लागली, की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याचे निश्चित कारण शोधण्यात येत आहे; तसेच याबाबत विद्युत निरीक्षकांना जळिताची माहिती दिली असून विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी पाहणी करून दोषनिश्चिती केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगितले. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर व कोषाध्यक्ष भानुदास सरडे यांनी सांगितले. (वार्ताहर)