शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना ‘हायटेन्शन’चा झटका!

By admin | Updated: February 22, 2015 22:57 IST

कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तर विद्युत कंपनीचे अधिकाऱ्यांनी विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच जबाबदारी स्पष्ट होईल, असे सांगितले. आज दुपारी दीडच्या सुमारास डिंंग्रजवाडी गावच्या हद्दीत वीज पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वीजवाहिन्यांखाली असणाऱ्या उसाला वाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली. क्षणात आगीचे डोंब उच्च क्षमतेच्या तारांच्या उंचीपेक्षाही वरती गेले होते. या क्षेत्राच्या शेजारीच ऊसतोड करणाऱ्या मजुरांनी व शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारचे कडक ऊन व सोसाट्याचा वारा यामुळे आगीने मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्यापून टाकले होते. आग आटोक्यात आणणे शक्य होत नसल्याने व त्यात वीजपुरवठाही खंडित झाल्याने वीजपंप चालू होत नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत असल्याचे माजी उपसरपंच मधुकर गव्हाणे यांनी सांगितले.या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना व रांजणगाव, शिरूर येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. दरम्यान, आगीला वाऱ्याची साथ मिळाल्याने आग पूर्वेकडून पश्चिमेकडे जात डिंंग्रजवाडी हद्दीतून कोरेगाव हद्दीतील उसाच्या शेतापर्यंत पोहोचली. आगीच्या भक्ष्यस्थानी उसाचे फडच्या फड शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर खाक झाले. उसाच्या फडातील काही ऊस तोडून आग रोखण्याचा प्रयत्न कोरेगावातील हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष कचरू ढेरंगे यांच्या पुढाकाराने काही शेतकऱ्यांनी केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे फ ड व इतर पिके आगीच्या तडाख्यातून वाचवण्यात यश आले. दरम्यान, अग्निशमन यंत्रणा मात्र जळीत क्षेत्रापर्यंत पोहोचू शकलीच नाही. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीजवाहिन्यांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळेच आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असले तरीही नेमकी आग उच्च दाब वाहिनीमुळे लागली, की कमी दाब क्षमतेच्या वाहिन्यांमुळे लागली, याचे निश्चित कारण शोधण्यात येत आहे; तसेच याबाबत विद्युत निरीक्षकांना जळिताची माहिती दिली असून विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी पाहणी करून दोषनिश्चिती केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगितले. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर व कोषाध्यक्ष भानुदास सरडे यांनी सांगितले. (वार्ताहर)