शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: August 31, 2015 03:53 IST

नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेत बेकायदा सायफन टाकून पाणीचोरी केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील ४७ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बारामती : नीरा डाव्या कालव्याच्या वितरिकेत बेकायदा सायफन टाकून पाणीचोरी केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील ४७ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. या कारवाईमुळे दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरीवर्गात खळबळ उडाली आहे.या घटनेची फिर्याद पाटबंधारे विभागाचे दशरथ तात्याबा पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नीरा डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. या कालव्यातून वितरिकेतही पाण्याचे आवर्तन सुरू आहे. या ४७ शेतकऱ्यांनी बेकायदा या वितरिकेत सायफन टाकून विहिरीत पाणी सोडले होते. याबाबत कालवा निरीक्षक नरहरी चांदगुडे यांनी संबंधित शेतकऱ्यांना वारंवार सूचना दिल्या. कऱ्हावागज, मेडद परिसरातील हे शेतकरी आहेत. पाटबंधारे खात्याच्या सूचनेकडे या शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)