शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

रात्री दोनपर्यंत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:36 IST

पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे

यवत : पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे शेतकºयांच्या रांगा होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.शुक्रवारी (दि. ४) यवत येथील आपले सरकार सेवा केंद्रात परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी रात्री उशिरापर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबून होते. सकाळपासून शेतकरी बांधव आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबलेले असताना शासकीय संकेतस्थळावर अर्ज दाखल होण्यास विलंब लागत होता. मात्र, ५ आॅगस्ट रोजी अखेरची मुदत असल्याने कितीही वेळ लागला तरी चालेल म्हणून शेतकºयांनी संबंधित केंद्रचालकांना विनंती करून थांबण्यास सांगितले. मात्र, अर्जांची संख्या जास्त असल्याने १२ वाजून गेले, तरी शेतकºयांचे अर्ज भरणे बाकीच होते. रात्री बारा वाजता आॅनलाईन अर्ज भरण्याची साईट बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. दिवसभर थांबूनदेखील अर्ज दाखल न झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. रात्री दोन वाजता शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून सेवा केंद्रात बोलावून घेतले व त्यांची व्यथा मांडली. काही महिला शेतकरी रात्री उशिरापर्यंत थांबूनदेखील तेथे अर्ज भरून न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी सकाळी कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाशी संपर्क झाल्यांनंतर त्यांनी शासनाच्या वतीने एक दिवसाची जादा मुदत अर्ज दाखल करण्यासाठी मिळाल्याचे सांगितले. आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचण निर्माण होत असल्याने आॅफलाईन अर्ज दाखल करून घेतले. यामुळे आज दिवसभर परत एकदा अर्ज दाखल करणारे शेतकरी सेवा केंद्रांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांची झाली गैरसोययापूर्वी भारनियमनामुळे शेतात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देणारे शेतकरी आपण पाहिले होते; मात्र रात्री दोन वाजेपर्यंत आपले सरकार सेवा केंद्राबाहेर रांगा लावून थांबलेले शेतकरी पाहण्याचा प्रसंग काल आला तो पीकविम्याचे अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी आलेले असताना.यवत येथील सेवा केंद्राबाहेर चक्क रात्री दोन वाजेपर्यंत शेतकरीवर्ग त्यात ज्येष्ठ नागरिक व विशेष म्हणजे शेतकरी महिलादेखील थांबून होत्या. पीकविम्याचा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असल्याने शेतकरी थांबलेले असूनदेखील आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची साईट मुदतीच्या अगोदरच्या रात्री बारा वाजता बंद पडल्याने शेतकºयांची मोठी अडचण झाली.