शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

रात्री दोनपर्यंत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:36 IST

पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे

यवत : पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे शेतकºयांच्या रांगा होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.शुक्रवारी (दि. ४) यवत येथील आपले सरकार सेवा केंद्रात परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी रात्री उशिरापर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबून होते. सकाळपासून शेतकरी बांधव आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबलेले असताना शासकीय संकेतस्थळावर अर्ज दाखल होण्यास विलंब लागत होता. मात्र, ५ आॅगस्ट रोजी अखेरची मुदत असल्याने कितीही वेळ लागला तरी चालेल म्हणून शेतकºयांनी संबंधित केंद्रचालकांना विनंती करून थांबण्यास सांगितले. मात्र, अर्जांची संख्या जास्त असल्याने १२ वाजून गेले, तरी शेतकºयांचे अर्ज भरणे बाकीच होते. रात्री बारा वाजता आॅनलाईन अर्ज भरण्याची साईट बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. दिवसभर थांबूनदेखील अर्ज दाखल न झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. रात्री दोन वाजता शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून सेवा केंद्रात बोलावून घेतले व त्यांची व्यथा मांडली. काही महिला शेतकरी रात्री उशिरापर्यंत थांबूनदेखील तेथे अर्ज भरून न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी सकाळी कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाशी संपर्क झाल्यांनंतर त्यांनी शासनाच्या वतीने एक दिवसाची जादा मुदत अर्ज दाखल करण्यासाठी मिळाल्याचे सांगितले. आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचण निर्माण होत असल्याने आॅफलाईन अर्ज दाखल करून घेतले. यामुळे आज दिवसभर परत एकदा अर्ज दाखल करणारे शेतकरी सेवा केंद्रांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांची झाली गैरसोययापूर्वी भारनियमनामुळे शेतात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देणारे शेतकरी आपण पाहिले होते; मात्र रात्री दोन वाजेपर्यंत आपले सरकार सेवा केंद्राबाहेर रांगा लावून थांबलेले शेतकरी पाहण्याचा प्रसंग काल आला तो पीकविम्याचे अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी आलेले असताना.यवत येथील सेवा केंद्राबाहेर चक्क रात्री दोन वाजेपर्यंत शेतकरीवर्ग त्यात ज्येष्ठ नागरिक व विशेष म्हणजे शेतकरी महिलादेखील थांबून होत्या. पीकविम्याचा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असल्याने शेतकरी थांबलेले असूनदेखील आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची साईट मुदतीच्या अगोदरच्या रात्री बारा वाजता बंद पडल्याने शेतकºयांची मोठी अडचण झाली.