शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

रात्री दोनपर्यंत शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:36 IST

पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे

यवत : पंतप्रधान पीकविमा योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी रात्री १२ पर्यंत मुदत असल्याने शेतकºयांनी बँकांमध्ये गर्दी केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री दोनपर्यंत बँकांपुढे शेतकºयांच्या रांगा होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.शुक्रवारी (दि. ४) यवत येथील आपले सरकार सेवा केंद्रात परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी रात्री उशिरापर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबून होते. सकाळपासून शेतकरी बांधव आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी थांबलेले असताना शासकीय संकेतस्थळावर अर्ज दाखल होण्यास विलंब लागत होता. मात्र, ५ आॅगस्ट रोजी अखेरची मुदत असल्याने कितीही वेळ लागला तरी चालेल म्हणून शेतकºयांनी संबंधित केंद्रचालकांना विनंती करून थांबण्यास सांगितले. मात्र, अर्जांची संख्या जास्त असल्याने १२ वाजून गेले, तरी शेतकºयांचे अर्ज भरणे बाकीच होते. रात्री बारा वाजता आॅनलाईन अर्ज भरण्याची साईट बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. दिवसभर थांबूनदेखील अर्ज दाखल न झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. रात्री दोन वाजता शेतकºयांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून सेवा केंद्रात बोलावून घेतले व त्यांची व्यथा मांडली. काही महिला शेतकरी रात्री उशिरापर्यंत थांबूनदेखील तेथे अर्ज भरून न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. शनिवारी सकाळी कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाशी संपर्क झाल्यांनंतर त्यांनी शासनाच्या वतीने एक दिवसाची जादा मुदत अर्ज दाखल करण्यासाठी मिळाल्याचे सांगितले. आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचण निर्माण होत असल्याने आॅफलाईन अर्ज दाखल करून घेतले. यामुळे आज दिवसभर परत एकदा अर्ज दाखल करणारे शेतकरी सेवा केंद्रांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांची झाली गैरसोययापूर्वी भारनियमनामुळे शेतात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देणारे शेतकरी आपण पाहिले होते; मात्र रात्री दोन वाजेपर्यंत आपले सरकार सेवा केंद्राबाहेर रांगा लावून थांबलेले शेतकरी पाहण्याचा प्रसंग काल आला तो पीकविम्याचे अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी आलेले असताना.यवत येथील सेवा केंद्राबाहेर चक्क रात्री दोन वाजेपर्यंत शेतकरीवर्ग त्यात ज्येष्ठ नागरिक व विशेष म्हणजे शेतकरी महिलादेखील थांबून होत्या. पीकविम्याचा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख असल्याने शेतकरी थांबलेले असूनदेखील आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची साईट मुदतीच्या अगोदरच्या रात्री बारा वाजता बंद पडल्याने शेतकºयांची मोठी अडचण झाली.