शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध विचार राष्ट्रीय एकात्मतेस घातक : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:00 IST

अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे

पिंपरी : अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे. त्यामुळे एकात्म भारतीय समाजाच्या अक्षरश: चिंधड्या होत आहेत. त्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संवैधानिक मूल्ये समाजाच्या अंतरंगात खोलवर रुजविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने बंधुताचे कार्य खरोखरच महान आहे, असे मत ८९अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि सुरून इंफोकोअर सिस्टिम या संस्थांच्या वतीने नवी सांगवी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सबनीस यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या वेळी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर, विवेक इनामदार, मधुश्री ओव्हाळ, महेंद्र भारती, सुनील यादव, सर्वेश सोनवणे उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘महापुरुषांना जातीच्या कप्प्यात बंदीस्त करून पुरोगामी विचारांची लढाई लढणे उचित नव्हे. हा सपशेल खोटारडेपणा आहे. त्यांच्या प्रगतिशील विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे.’’प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. सर्वेश सोनवणे आणि सुनील यादव यांनी संयोजन केले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीस