शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बदल्यांसाठी बनावट कागदपत्रे; संवर्ग १, २ आणि ४ ची बनावट पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:59 IST

राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता.

- निनाद देशमुखपुणे : राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता. हा अर्ज भरताना शहरालगतच्या तसेच चांगल्या ठिकाणच्या शाळा मिळवण्यासाठी काहींनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्य शासनानेही याची गंभीर दखल घेतली असून, अशा शिक्षकांच्या कागत्रपत्रांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.बदल्यांमधील घोळ कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे या वर्षी आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेचा जिल्ह्यातील जवळपास बाराशे शिक्षकांना फटका बसला आहे. ५ हजार ३८८ शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांपैकी सुमारे ६५५ शिक्षक विस्थापित झाले आहेत.याबरोबरच, शिक्षकांसह पती-पत्नी एकत्रीकरण, पसंतीच्याविरोधात मिळालेल्या शाळा अशा अनेक त्रुटी या बदली प्रक्रियेत राहिल्या आहेत. मात्र, काही शिक्षकांनी चांगल्या शाळा मिळाव्या यासाठी संवर्ग १, २, व ४ मधील शिक्षकांच्या बनावट प्रमाणपत्र व बनावटमाहिती सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. विस्थापित शिक्षकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये या शिक्षकांची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीत काही शिक्षकांनी चुकीची प्रमाणपत्रे सादर करून चांगल्या ठिकाणी बदल्या मिळवल्याच्या तक्रारी केल्या. बदल्यांच्या पहिल्या फेरीत गुगल मॅपचा चुकीच्या पद्धतीने वापर करून संवर्ग २ मधील पती आणि पत्नी यांनी ३० कि.मी.च्या आत गुगल मॅपिंगद्वारे दाखूनही बनावट प्रमाणपत्राद्वारे बदली मागितली. ही बदली मागताना ३० कि.मी.च्या बाहेरचे गाव मागत सूट मिळवली. काहींनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून तसेच कुमारिका विधवा परित्यक्ता असल्याचे भासवून बदली प्रक्रियेचा चुकीचा लाभ घेतला. संवर्ग ४मध्ये माहिती भरताना जिल्ह्याबाहेरील शिक्षकांनी जिल्ह्यातील रुजू तारीख न लिहिता ते ज्या जिल्ह्यातनोकरीला लागले तेथील तारीख लिहिल्याने आधीपासून सेवेने जास्त असणाऱ्या शिक्षकांना त्याचा फटका बसला आहे.या तक्रारींची शासनानेही गंभीर दखल घेतली आहे. ज्या ठिकाणी शिक्षक रुजू होणार आहेत, त्या ठिकाणी रुजू होण्याआधी त्यांच्या सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार आहे. यात दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर होणार छाननीशिक्षकांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरावर पुन्हा कागत्रपत्रे तपासण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे तसे पत्र आज देण्यात येणार आहे. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. जिल्हा परिषदेकडे दोन तालुक्यांत तक्रारींचे ३ अर्ज आले आहेत.शिक्षकांच्या आॅर्डर निघाल्या आहेत. ते रुजू होताना त्यांच्या अर्जांची छाननी गट शिक्षणाधिकाºयांद्वारे करण्यात येणार आहे. तक्रारी जरी आल्या असल्या तरी तपासणीदरम्यान असले काही प्रकार आढळल्यास थेट शासनानेच कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसे पत्रही जिल्हा परिषदेला मिळाले असून, असे बोगस शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. - सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Teacherशिक्षक