शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाअभावी गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:24 IST

पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण : ७0 गावे, औद्योगिक वसाहत असून ६६ पोलीस कर्मचारी

शिवाजी आतकरी

खेड : औद्योगिक वसाहतीमुळे चाकण बकाल झाले. गुन्हेगारीचे माहेरघर बनलेल्या चाकणचे सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. मनुष्यबळाअभावी व कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस गुन्हेगारीस आळा घालू शकत नाही. पोलिसांच्या अपयशामुळे चाकण क्षेत्रात सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न मात्र गंभीर होत चालला आहे.

चाकण पोलीस ठाण्यांतर्गत ७० गावे येतात. या गावांची लोकसंख्या ३ लाखांपेक्षा अधिक आहे. पोलीस खात्याच्या सूत्रानुसार दर हजार लोकसंख्येमागे एक पोलीस, असे गणित असायला हवे. प्रत्यक्षात मात्र चाकण पोलीस ठाण्यात ६६ पोलीस कर्मचारी नियुक्तीस आहेत. प्रचंड मोठे औद्योगिक क्षेत्र, त्या अनुषंगाने वाढलेली लोकसंख्या, परप्रांतीयांची लक्षणीय लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्रातील माथाडी, विविध ठेकेदारीतून वाढलेली गुंडागर्दी, औद्योगिक वसाहतीतील चोऱ्या, बलात्कार व विनयभंगासारखे गुन्हे आणि खून- मारामाºया यावर नियंत्रण राखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.

तीन लाखांवर लोकसंख्येसाठी केवळ ६६ पोलीस हे समीकरणच मुळी हास्यास्पद आहे. अकरा महिला कर्मचारी मात्र एकही महिला पोलीस अधिकारी नाही, हेही अनाकलनीय आहे. कारण विनयभंग, बलात्काराचे गुन्हे चाकण हद्दीत जास्त आहेत. गतवर्षी १३०० गुन्ह्यांची नोंद येथे झाली. या वर्षी आॅगस्टमध्येच हा आकडा आठशेच्या जवळ पोहोचला आहे. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता, मनुष्यबळ, सोयीसुविधा वाढवणे आवश्यक आहे; अन्यथा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार हे तितकेच खरे!चाकणमधील वाहतूककोंडीचा जटिल प्रश्न आणि त्यासाठी वापरले जाणारे मनुष्यबळ तास सध्या व्यर्थ जात आहे. अतिक्रमणे, वाहनचालकांची बेशिस्ती यांमुळे मनुष्यतासांचा मोठा अपव्यय होत आहे. व्यस्त पोलिसांमुळे गुन्हेगारी रोखणे, गुन्ह्यांची उकल करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. विविध प्रकारचे गुन्हे, गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांना अधिक सोयीसुविधा पुरवणे ही गरज निर्माण झाली आहे. दुसºया बाजूला पोलिसांनीही आपला दबदबा निर्माण करायला हवा. पोलिसांची बिले, सुविधा याबाबत शासनाने काळजीपूर्वक उपाययोजना तातडीने करायला हव्यात; अन्यथा चाकण पोलीस कायम तणावाखाली राहणार, क्रयशक्ती घटणार, गुन्हेगारी वाढणार हेही तितकेच खरे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे बिरुद सार्थ ठरविण्यासाठी पोलीस दलाचे सोयीसुविधांच्या अनुषंगाने आमूलाग्र बदल शासनपातळीवरून करणे गरजेचे असल्याचे चाकण पोलीस ठाण्यावरून दिसते.

नवीन पोलीस ठाण्याचे काय?गस्तीसाठी दोन चारचाकी, पाच दुचाक्या या ठाण्यात उपलब्ध असल्यातरी सत्तर गावांसाठी त्या पुरेशा नाहीत. औद्योगिक वसाहत, शेलपिंपळगाव, आंबेठाण, पाईट, चाकण, वाड्या, चाकण असे मोठे बीट आणि येथील गुन्हेगारी लक्षात घेता मनुष्यबळाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल किती आणि कशी होते, हाही मोठा प्रश्नच आहे. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे प्रस्ताव शासनदरबारी महिनोन्महिने प्रलंबित आहे. चाकण पोलीस ठाण्यावरील ताण कमी करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे उत्तम उपाय असला तरी नवीन पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लागत नाही, हे दुर्दैव आहे.

टॅग्स :Puneपुणे