शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा सुनावणी वेळी विलक्षण स्तब्धता

By admin | Updated: May 10, 2017 04:17 IST

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर पूर्व बाजूच्या कोपऱ्यात विशेष सत्र न्यायालय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर पूर्व बाजूच्या कोपऱ्यात विशेष सत्र न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज निकालाच्या अंतिम टप्प्यात आल्याने सलग २ दिवस खूप गर्दी झाली. अनेक तास उभे राहून जाणकार आणि नवोदित वकील, पोलीस आणि नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी हे कामकाज पाहिले. सकाळी साडेदहापासूनच न्यायालयात पाय ठेवायलाही जागा नव्हती. न्यायालयातील पश्चिम बाजूच्या भिंतीजवळ आरोपींची बसण्याची जागा, अर्थात लाकडी पिंजरा होता. आरोपींपर्यंत न्यायाधीशांचा आवाज पोहोचावा, यासाठी तो हलवून पुढे आणण्यात आला. १० वाजून ४५ मिनिटांनी आरोपींना न्यायालयाबाहेर आणून थांबविण्यात आले. ११ वाजून ५ मिनिटांनी पिंजऱ्यातील बाकावर बसविण्यात आले. राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या क्रमाने आरोपींना लाकडी पिंजऱ्यात बसविण्यात आले. त्यांच्याभोवती चौफेर पोलिसांचे कडे होते. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याला आधीच न्यायालयात हजर करून न्यायासनाच्या उजव्या बाजूला बसविण्यात आले होते. न्यायालयात ११च्या सुमारास खूप गर्दी झाली. त्यामुळे पुजारी कुटुंबीयांनाही काही वेळ उभेच राहावे लागले. ११ वाजून ५ मिनिटांनी न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर न्यायासनावर स्थानापन्न होताच नि: शब्द शांतता पसरली. ११ वाजून १६ मिनिटांनी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर न्यायालयात आले. आरोपींना क्रमवार न्यायासनासमोर आणण्यात आले. दोषी ठरविल्याबाबत काही सांगायचे आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्या वेळी राऊत याने ‘आपल्याला कमीत कमी शिक्षा द्यावी. मला माझ्या आई, पत्नी व मुलीला पाहायलाही मिळालेले नाही,’ असे सांगितले. लाकडी पिंजऱ्यात परत आणून बसविल्यानंतर त्याला रडू कोसळले. ११ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास निंबाळकर यांनी युक्तिवाद सुरू केला. दुपारी १२.५५ पर्यंत तो सुरू होता. इंग्रजीमध्ये निंबाळकर यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. ‘ज्या समाजात महिला सुरक्षित असतात, तो समाज प्रगत असतो,’ या स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्याचा संदर्भही त्यांनी दिला.नयनाला न्यायासाठी ७ वर्षे लढत राहिलो -लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नयना माझी प्रेरणा आहे. कधी तरी ‘नर्व्हस’ व्हायला होतं. सगळ्यापासून लांब जावंसं वाटतं. पण मी गेलो, तर नयनाला न्याय कोण मिळवून देणार? ही भावना होती. त्यामुळे ७ वर्षांपासून लढा देत राहिलो, असे नयना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘‘पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांची काय परिस्थिती होते, हे त्यांनाच माहिती असते. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरात ही घटना घडली होती. अशा प्रकारच्या खटल्यांची सुनावणी लवकर होऊन निकाल लागला आणि कठोर शिक्षा झाली, तर असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.’’महिलांच्या असुरक्षिततेच्या मुद्द्यांवर चर्चा, निर्णय होतात; त्यांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. तपासात पोलिसांकडून नकळत त्रुटी राहतात. परिणामी, गुन्हेगार सुटतात. त्यामुळे महिलांसंदर्भातील अत्याचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांचे मार्गदर्शनही हवे. पोलिसांना सक्षम सुविधा पुरवायला हव्यात. वेगाने तपास करण्यासाठी पोलिसांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.सहा महिन्यांच्या आत गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी. समाज म्हणून अशा घटनांबद्दल सजग राहायला हवे; तरच प्रशासनावर आणि सरकारवर वचक बसेल. घटना रोखता येतील आणि न्याय मिळेल, असे मत अभिजित यांनी व्यक्त केले.