शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

शिक्षा सुनावणी वेळी विलक्षण स्तब्धता

By admin | Updated: May 10, 2017 04:17 IST

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर पूर्व बाजूच्या कोपऱ्यात विशेष सत्र न्यायालय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर पूर्व बाजूच्या कोपऱ्यात विशेष सत्र न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज निकालाच्या अंतिम टप्प्यात आल्याने सलग २ दिवस खूप गर्दी झाली. अनेक तास उभे राहून जाणकार आणि नवोदित वकील, पोलीस आणि नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी हे कामकाज पाहिले. सकाळी साडेदहापासूनच न्यायालयात पाय ठेवायलाही जागा नव्हती. न्यायालयातील पश्चिम बाजूच्या भिंतीजवळ आरोपींची बसण्याची जागा, अर्थात लाकडी पिंजरा होता. आरोपींपर्यंत न्यायाधीशांचा आवाज पोहोचावा, यासाठी तो हलवून पुढे आणण्यात आला. १० वाजून ४५ मिनिटांनी आरोपींना न्यायालयाबाहेर आणून थांबविण्यात आले. ११ वाजून ५ मिनिटांनी पिंजऱ्यातील बाकावर बसविण्यात आले. राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या क्रमाने आरोपींना लाकडी पिंजऱ्यात बसविण्यात आले. त्यांच्याभोवती चौफेर पोलिसांचे कडे होते. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याला आधीच न्यायालयात हजर करून न्यायासनाच्या उजव्या बाजूला बसविण्यात आले होते. न्यायालयात ११च्या सुमारास खूप गर्दी झाली. त्यामुळे पुजारी कुटुंबीयांनाही काही वेळ उभेच राहावे लागले. ११ वाजून ५ मिनिटांनी न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर न्यायासनावर स्थानापन्न होताच नि: शब्द शांतता पसरली. ११ वाजून १६ मिनिटांनी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर न्यायालयात आले. आरोपींना क्रमवार न्यायासनासमोर आणण्यात आले. दोषी ठरविल्याबाबत काही सांगायचे आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्या वेळी राऊत याने ‘आपल्याला कमीत कमी शिक्षा द्यावी. मला माझ्या आई, पत्नी व मुलीला पाहायलाही मिळालेले नाही,’ असे सांगितले. लाकडी पिंजऱ्यात परत आणून बसविल्यानंतर त्याला रडू कोसळले. ११ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास निंबाळकर यांनी युक्तिवाद सुरू केला. दुपारी १२.५५ पर्यंत तो सुरू होता. इंग्रजीमध्ये निंबाळकर यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. ‘ज्या समाजात महिला सुरक्षित असतात, तो समाज प्रगत असतो,’ या स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्याचा संदर्भही त्यांनी दिला.नयनाला न्यायासाठी ७ वर्षे लढत राहिलो -लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नयना माझी प्रेरणा आहे. कधी तरी ‘नर्व्हस’ व्हायला होतं. सगळ्यापासून लांब जावंसं वाटतं. पण मी गेलो, तर नयनाला न्याय कोण मिळवून देणार? ही भावना होती. त्यामुळे ७ वर्षांपासून लढा देत राहिलो, असे नयना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘‘पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांची काय परिस्थिती होते, हे त्यांनाच माहिती असते. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरात ही घटना घडली होती. अशा प्रकारच्या खटल्यांची सुनावणी लवकर होऊन निकाल लागला आणि कठोर शिक्षा झाली, तर असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.’’महिलांच्या असुरक्षिततेच्या मुद्द्यांवर चर्चा, निर्णय होतात; त्यांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. तपासात पोलिसांकडून नकळत त्रुटी राहतात. परिणामी, गुन्हेगार सुटतात. त्यामुळे महिलांसंदर्भातील अत्याचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांचे मार्गदर्शनही हवे. पोलिसांना सक्षम सुविधा पुरवायला हव्यात. वेगाने तपास करण्यासाठी पोलिसांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.सहा महिन्यांच्या आत गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी. समाज म्हणून अशा घटनांबद्दल सजग राहायला हवे; तरच प्रशासनावर आणि सरकारवर वचक बसेल. घटना रोखता येतील आणि न्याय मिळेल, असे मत अभिजित यांनी व्यक्त केले.