शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

विषवल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करावी

By admin | Updated: May 31, 2017 01:21 IST

तंबाखूच्या उत्पादनावर नियंत्रणं आणल्यास व्यसनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. देशात तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन आणि

तंबाखूच्या उत्पादनावर नियंत्रणं आणल्यास व्यसनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. देशात तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन आणि त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विषवVल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करायची असेल तर तंबाखूच्या शेतीवर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि तंबाखूचा समावेश अमली पदार्थांच्या यादीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी दिली. शालेय अभ्यासक्रमात व्यसनमुक्तीच्या धड्यांचा समावेश केल्यास मुलांवर संस्कार होऊ शकतील, असेही ते म्हणाले. तरुणांमध्ये तंबाखूसेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तंबाखूच्या सातत्यपूर्ण सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, फुप्फुस, अन्ननलिका तसेच जिभेच्या कर्करोगाचा धोकाही वाढला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या एका रुग्णावरील शस्त्रक्रियेचा खर्च चार ते पाच लाख रुपयांच्या घरात जातो. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’ या नियमानुसार, तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण आणायचे असेल तर विषवल्ली तंबाखू समाजातून हद्दपार करण्याची गरज आहे. ३१ मे हा ‘जागतिक तंबाखू निषेध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे दोन मागण्यांबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तंबाखूच्या शेतीवर बंदी घालावी आणि तंबाखूला अमली पदार्थांच्या यादीत समाविष्ट करावे, या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत.गंगवाल म्हणाले, ‘अफूच्या शेतीवर टप्प्याटप्प्याने बंदी घातल्यामुळे हे व्यसन समाजातून नाहीसे झाले. अशाच प्रकारे, पुढील ५ वर्षांमध्ये तंबाखूच्या शेतीवर टप्प्याटप्प्याने बंदी घातल्यास व्यसनावर नियंत्रण आणता येऊ शकते. यामुळे तंबाखूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्याय शोधता येतील आणि त्यांचे नुकसानही होणार नाही. पुण्यात काळ्या बाजारात दररोज हजारो टन गुटखा दाखल होतो आणि तरुणांपर्यंत पोचतो. गुजरात, कर्नाटक या राज्यांच्या सीमांवरूनही तंबाखू महाराष्ट्रात दाखल होतो. पुडीतले हे सर्वांत विषारी उत्पादन आहे. तंबाखूच्या उत्पादनावर नियंत्रण आणल्यास या प्रकाराला आळा बसू शकेल.तंबाखूचा समावेश अमली पदार्थांमध्ये करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे सर्व नियम तंबाखूला लागू झाल्यास तरुण पिढीसमोरील सर्वांत मोठा धोका टाळता येऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा आणि तंबाखूविरोधी मोहीम राबवली जात आहे. मात्र, यासाठी शासनातर्फे ठोस धोरण राबवले जात नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तंबाखूविरोधी चळवळीतील योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. कायद्यानुसार, शाळांच्या १०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू विक्रीस कायद्यानुसार मनाई करण्यात आली आहे. मात्र, हे नियम धाब्यावर बसवले जातात. व्यसनमुक्तीची लढाई यशस्वी करायची असेल, तर ‘नीती’ आणि ‘भीती’ यांची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते आपल्या चळवळीतून नीती राबवत असतात. शासनातर्फे ‘भीती’ अर्थात कायद्याचा वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तंबाखूविरोधातला हा सर्वंकष लढा असून, यामध्ये जनजागृती आणि प्रत्येकाचा सहभाग यातून मोठा बदल घडून येऊ शकेलतंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी व्यसनमुक्तीच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. शालेय स्तरापासून व्यसनमुक्तीचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास मुलांवर लहानपणापासून संस्कार होऊ शकतील. आजकाल उच्चभ्रू वर्गामध्ये पालक मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ही कसर पैैशांतून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने आणि मुलांच्या हाती पैसा खुळखुळत असल्याने ते सहजपणे व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळेच शालेय व महाविद्यालयीन तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. सिगरेट, बिडी, जर्दा, गुटखा, मावा, मशेरी, तंबाखू पावडर, तपकीर अशा पदार्थांच्या व्यसनांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी समाजातील सर्व पातळ्यांमधून प्रयत्न झाल्यास व्यसनविरोधी लढाईला लक्षणीय यश मिळू शकेल.