शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

प्रशस्त रस्ते, तरीही वाहतूककोंडी!

By admin | Updated: February 24, 2016 03:32 IST

शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत.

- नीलेश जंगम,  पिंपरीशहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत. त्यामुळे प्रशस्त रस्ते अशी ओळख असलेल्या शहरामधील नागरिकांना सातत्याने वाहतूक-कोंडीला सामोरे जावे लागत आहे.पाडवा, अक्षयतृतीया, दसरा, दिवाळी अशा सणांचे औचित्य साधून लोक वाहने खरेदी करीत असतात. याशिवाय वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असे निमित्तही वाहनखरेदीला सोडले जात नाही. यामुळे वाहनसंख्येत वाढ होत चालली आहे. सार्वजनिक वाहतूक न वापरता लोक खासगी वाहतूक सुविधेला जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कामासाठी, हाकेच्या अंतरावर जाण्यासाठीसुद्धा लोकांना वाहनाची सवय झाली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ तर झाली आहेच, शिवाय अपघातही वाढू लागले आहेत.निगडी-तळवडे रस्ता, फुगेवाडी ते खडकी, रावेत-औंध रस्ता, भोसरी-मोशी या रस्त्यांसह वाकड, हिंजवडी, भोसरी, देहूरोड या प्रमुख उपनगरात तसेच, नाशिक फाटा, काळेवाडी फाटा, चापेकर चौक, साने चौक या चौकांमध्ये सुद्धा वाहतूककोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे. कमीत-कमी अंतर कापण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा लागत आहे. शहरात नोकरी,व्यवसाय व शिक्षणासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून लोक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली व वाहनांची संख्याही वाढली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) हद्दीत लोणावळा ते दापोडी, हिंजवडी, मान ते राजगुरूनगर, मंचर या सर्व भागांचा समावेश होतो. या भागातील वाहनांची नोंदणी चिखलीतील आरटीओत होते. एप्रिल २००२ ते मार्च २००३ या आर्थिक वर्षात आरटीओ हद्दीत दोन लाख ३६ हजार ८०१ दुचाकी, ६० हजार ६९८ चारचाकी वाहनसंख्या होती. २०१४-१५ या वर्षात दुचाकींची संख्या ९ लाख ६५ हजार ७१२ तर, चारचाकी वाहनांची संख्या ३ लाख २६ हजार ८४ पर्यंत पोहोचली. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत १३ वर्षांत तब्बल पाचपट वाढ झालेली दिसून येत आहे. खासगी वाहनांचा वापर वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, तापमान व प्रदुषणातही वाढ होत आहे. शाळा आणि महाविद्यालयात असतानाच पाल्यास पालकांकडून वाहने दिली जातात. शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते व अपघातांचे प्रमाणही वाढते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची, गरज भासू लागली आहे.- महेंद्र रोकडे, सहायक आयुक्त वाहतूक विभागसार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याची गरजबस, रेल्वेसोबत भविष्यातील रिंग रोड, मेट्रो, ट्रॉमा आदी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तरच, स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होणार आहे. प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.