शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

प्रशस्त रस्ते, तरीही वाहतूककोंडी!

By admin | Updated: February 24, 2016 03:32 IST

शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत.

- नीलेश जंगम,  पिंपरीशहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत. त्यामुळे प्रशस्त रस्ते अशी ओळख असलेल्या शहरामधील नागरिकांना सातत्याने वाहतूक-कोंडीला सामोरे जावे लागत आहे.पाडवा, अक्षयतृतीया, दसरा, दिवाळी अशा सणांचे औचित्य साधून लोक वाहने खरेदी करीत असतात. याशिवाय वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असे निमित्तही वाहनखरेदीला सोडले जात नाही. यामुळे वाहनसंख्येत वाढ होत चालली आहे. सार्वजनिक वाहतूक न वापरता लोक खासगी वाहतूक सुविधेला जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कामासाठी, हाकेच्या अंतरावर जाण्यासाठीसुद्धा लोकांना वाहनाची सवय झाली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ तर झाली आहेच, शिवाय अपघातही वाढू लागले आहेत.निगडी-तळवडे रस्ता, फुगेवाडी ते खडकी, रावेत-औंध रस्ता, भोसरी-मोशी या रस्त्यांसह वाकड, हिंजवडी, भोसरी, देहूरोड या प्रमुख उपनगरात तसेच, नाशिक फाटा, काळेवाडी फाटा, चापेकर चौक, साने चौक या चौकांमध्ये सुद्धा वाहतूककोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे. कमीत-कमी अंतर कापण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा लागत आहे. शहरात नोकरी,व्यवसाय व शिक्षणासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून लोक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली व वाहनांची संख्याही वाढली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) हद्दीत लोणावळा ते दापोडी, हिंजवडी, मान ते राजगुरूनगर, मंचर या सर्व भागांचा समावेश होतो. या भागातील वाहनांची नोंदणी चिखलीतील आरटीओत होते. एप्रिल २००२ ते मार्च २००३ या आर्थिक वर्षात आरटीओ हद्दीत दोन लाख ३६ हजार ८०१ दुचाकी, ६० हजार ६९८ चारचाकी वाहनसंख्या होती. २०१४-१५ या वर्षात दुचाकींची संख्या ९ लाख ६५ हजार ७१२ तर, चारचाकी वाहनांची संख्या ३ लाख २६ हजार ८४ पर्यंत पोहोचली. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत १३ वर्षांत तब्बल पाचपट वाढ झालेली दिसून येत आहे. खासगी वाहनांचा वापर वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, तापमान व प्रदुषणातही वाढ होत आहे. शाळा आणि महाविद्यालयात असतानाच पाल्यास पालकांकडून वाहने दिली जातात. शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते व अपघातांचे प्रमाणही वाढते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची, गरज भासू लागली आहे.- महेंद्र रोकडे, सहायक आयुक्त वाहतूक विभागसार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याची गरजबस, रेल्वेसोबत भविष्यातील रिंग रोड, मेट्रो, ट्रॉमा आदी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तरच, स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होणार आहे. प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.