शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मराठी कलाकारांचे हिंदीत खच्चीकरण

By admin | Updated: January 14, 2017 03:30 IST

मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील वातावरणात बराच फरक जाणवतो. मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर हिंदी चित्रसृष्टीत

पुणे : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील वातावरणात बराच फरक जाणवतो. मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर हिंदी चित्रसृष्टीत वावरताना काहीसे दडपण यायचे. मराठी अभिनेत्रींना भाषेचा प्रश्न आड येत असावा. आजच्या अभिनेत्री हिंदी चांगल्या प्रकारे बोलतात; मात्र हिंदी चित्रसृष्टीत मराठी माणसाचे खच्चीकरण केले जाते. मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत असताना आजूबाजूचे लोक नैैराश्य निर्माण करीत असल्याने दडपण यायचे. त्यामुळे अभिनेत्रींना अवघडल्यासारखे होत असावे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी व्यक्त केले. ‘हल्लीचे मराठी चित्रपट आशयसंपन्न आहेत, याबद्दल दुमत नाही. मात्र, नवोदित मराठी तारकांनी हिंदीत जाताना पुरेशी तयारी करून जावे’, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सीमा देव आणि रमेश देव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि श्रीरंग गोडबोले यांनी देव दाम्पत्याशी संवाद साधला. तत्पूर्वी, रमेश देव व सीमा देव यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. सीमा देव यांनी राजाभाऊ परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रयींच्या आठवणींना उजाळा दिला. ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’ या गाजलेल्या चित्रपटांचे अनुभवही कथन केले. त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या आणि पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत बराच फरक जाणवतो. राजाभाऊ स्वत: अभिनय करून, ओरडून भूमिका समाजावून सांगायचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी तयार झाले. आजवर मिळालेल्या सर्व यशाचे श्रेय त्यांनाच जाते. राजा ठाकूर, मधुकर पाठक, धर्माधिकारी यांच्यासह काम करतानाही चांगले अनुभव मिळाले.’’‘अभिमान’ चित्रपटाचा विषय निघताच सीमा देव म्हणाल्या, ‘‘मी आणि रमेश दोघांनीही अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळविले. अशा वेळी अहंकार दुखावला जाऊन मतभेद होऊ शकले असते; मात्र आम्ही तसे होऊ दिले नाही. संसाराची घडी विस्कटू नये आणि मुलांवर परिणाम होऊ नयेत, यादृष्टीने एकमेकांना समजून आजवरचा प्रवास केला.’’ (प्रतिनिधी)