शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवरील परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने ...

पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने त्यात योगदान दिले पाहिजे, असा सूर ‘तेर पॉलिसी सेंटर' आयोजित 'परिसंस्थेची पुनर्रचना ' या वेबिनारमध्ये उमटला.

'तेर पॉलिसी सेंटर'च्या वतीने 'परिसंस्थेची पुनर्रचना' या विषयावर जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला परिसंवादाचे आयोजन केले होते.

'एमआयटी-डब्ल्यूपीयू' चे संशोधक डॉ. पंकज कोपर्डे, 'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन, 'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री, डॉ. कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले.

तेर पॉलिसी सेंटर'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले.

'तेर पॉलिसी सेंटर' च्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ पंकज कोपर्डे म्हणाले, 'परिसंस्थेची पुनर्रचना ही मोठी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. या विषयाच्या अमलात आलेल्या चांगल्या संकल्पना अभ्यासल्या पाहिजेत. त्यात नागरिकांचा सहभाग ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे.

'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन म्हणाल्या, 'परिसंस्थेची आणि पर्यावरणाची काळजी करताना इको -फेमिनिझम ' संकल्पनेवर भर दिला पाहिजे.

'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री म्हणाले, ‘प्रदूषणामुळे समुद्रातील परिसंस्था नष्ट होत आहेत, त्याचा पृथ्वीवर परिणाम होत आहे. अजून परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न वाढवले पाहिजेत.’

डॉ कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर म्हणाल्या, 'पर्यावरणाची काळजी घेण्यामध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आवश्यक आहे. ऊर्जेचा कमी वापर, प्लास्टिक निर्मूलन, पाण्याची उधळपट्टी टाळणे, पर्यावरणपूरक गोष्टींचा प्रसार यामध्ये युवा पिढी मोठे योगदान देऊ शकते.

डॉ राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘पृथ्वीवरील परिसंस्था जपण्यासाठी मानवाने निर्मित केलेल्या व्यवस्था आधी जपल्या पाहिजेत. भारतात पृथ्वीला माता समजले जाते. इतर कोणत्याही देशात पृथ्वीला माता समजले जात नाही. त्या दृष्टीने इको-फेमिनिझमला आपण सुरुवात केली आहेच, त्यामुळे भारतीय म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे.'