शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पृथ्वीवरील परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने ...

पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने त्यात योगदान दिले पाहिजे, असा सूर ‘तेर पॉलिसी सेंटर' आयोजित 'परिसंस्थेची पुनर्रचना ' या वेबिनारमध्ये उमटला.

'तेर पॉलिसी सेंटर'च्या वतीने 'परिसंस्थेची पुनर्रचना' या विषयावर जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला परिसंवादाचे आयोजन केले होते.

'एमआयटी-डब्ल्यूपीयू' चे संशोधक डॉ. पंकज कोपर्डे, 'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन, 'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री, डॉ. कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले.

तेर पॉलिसी सेंटर'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले.

'तेर पॉलिसी सेंटर' च्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ पंकज कोपर्डे म्हणाले, 'परिसंस्थेची पुनर्रचना ही मोठी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. या विषयाच्या अमलात आलेल्या चांगल्या संकल्पना अभ्यासल्या पाहिजेत. त्यात नागरिकांचा सहभाग ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे.

'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन म्हणाल्या, 'परिसंस्थेची आणि पर्यावरणाची काळजी करताना इको -फेमिनिझम ' संकल्पनेवर भर दिला पाहिजे.

'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री म्हणाले, ‘प्रदूषणामुळे समुद्रातील परिसंस्था नष्ट होत आहेत, त्याचा पृथ्वीवर परिणाम होत आहे. अजून परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न वाढवले पाहिजेत.’

डॉ कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर म्हणाल्या, 'पर्यावरणाची काळजी घेण्यामध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आवश्यक आहे. ऊर्जेचा कमी वापर, प्लास्टिक निर्मूलन, पाण्याची उधळपट्टी टाळणे, पर्यावरणपूरक गोष्टींचा प्रसार यामध्ये युवा पिढी मोठे योगदान देऊ शकते.

डॉ राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘पृथ्वीवरील परिसंस्था जपण्यासाठी मानवाने निर्मित केलेल्या व्यवस्था आधी जपल्या पाहिजेत. भारतात पृथ्वीला माता समजले जाते. इतर कोणत्याही देशात पृथ्वीला माता समजले जात नाही. त्या दृष्टीने इको-फेमिनिझमला आपण सुरुवात केली आहेच, त्यामुळे भारतीय म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे.'