शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

पृथ्वीवरील परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने ...

पुणे : मानवाच्या विकासविषयक चुकीच्या कल्पनांमुळे पृथ्वीवरील परिसंस्था धोक्यात आल्या आहेत, पर्यावरण परिसंस्था जपण्याची जबाबदारी सर्वांची असून पृथ्वीवरील प्रत्येकाने त्यात योगदान दिले पाहिजे, असा सूर ‘तेर पॉलिसी सेंटर' आयोजित 'परिसंस्थेची पुनर्रचना ' या वेबिनारमध्ये उमटला.

'तेर पॉलिसी सेंटर'च्या वतीने 'परिसंस्थेची पुनर्रचना' या विषयावर जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला परिसंवादाचे आयोजन केले होते.

'एमआयटी-डब्ल्यूपीयू' चे संशोधक डॉ. पंकज कोपर्डे, 'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन, 'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री, डॉ. कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले.

तेर पॉलिसी सेंटर'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले.

'तेर पॉलिसी सेंटर' च्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ पंकज कोपर्डे म्हणाले, 'परिसंस्थेची पुनर्रचना ही मोठी आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. या विषयाच्या अमलात आलेल्या चांगल्या संकल्पना अभ्यासल्या पाहिजेत. त्यात नागरिकांचा सहभाग ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे.

'फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल'च्या सल्लागार शादी जहान बिन म्हणाल्या, 'परिसंस्थेची आणि पर्यावरणाची काळजी करताना इको -फेमिनिझम ' संकल्पनेवर भर दिला पाहिजे.

'ओशन गव्हर्नन्स लिमिटेड'चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री म्हणाले, ‘प्रदूषणामुळे समुद्रातील परिसंस्था नष्ट होत आहेत, त्याचा पृथ्वीवर परिणाम होत आहे. अजून परिस्थिती हाताबाहेर गेली नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न वाढवले पाहिजेत.’

डॉ कलाम संशोधन शिष्यवृत्तीप्राप्त पर्यावरणप्रेमी मंजींदर कौर म्हणाल्या, 'पर्यावरणाची काळजी घेण्यामध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आवश्यक आहे. ऊर्जेचा कमी वापर, प्लास्टिक निर्मूलन, पाण्याची उधळपट्टी टाळणे, पर्यावरणपूरक गोष्टींचा प्रसार यामध्ये युवा पिढी मोठे योगदान देऊ शकते.

डॉ राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘पृथ्वीवरील परिसंस्था जपण्यासाठी मानवाने निर्मित केलेल्या व्यवस्था आधी जपल्या पाहिजेत. भारतात पृथ्वीला माता समजले जाते. इतर कोणत्याही देशात पृथ्वीला माता समजले जात नाही. त्या दृष्टीने इको-फेमिनिझमला आपण सुरुवात केली आहेच, त्यामुळे भारतीय म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे.'