शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

बालकांच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र यावे, लोकमत, युनिसेफ आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:29 IST

संयुक्त विद्यमाने व युनिसेफच्या सहकार्याने बालदिनानिमित्त आयोजित ‘आदर भविष्याचा’ (आॅनरिंग द फ्युचर) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत सहज शिक्षण अजूनही पोहोचू शकत नाही, ही बाब प्रकर्षाने समोर आली.

पुणे : ‘लोकमत’ बाल विकास मंच व अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने व युनिसेफच्या सहकार्याने बालदिनानिमित्त आयोजित ‘आदर भविष्याचा’ (आॅनरिंग द फ्युचर) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत सहज शिक्षण अजूनही पोहोचू शकत नाही, ही बाब प्रकर्षाने समोर आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासाठी झटणाºया लहान हातांचा गौरव करण्यात आला. ‘लोकमत’च्या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. त्याचप्रमाणे बालकांच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, अशी अपेक्षा उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली.‘आदर भविष्याचा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुणे विभागाच्या सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत, युनिसेफच्या कम्युनिकेशन स्पेशालिस्ट स्वाती मोहपात्रा, अभिनेत्री सखी गोखले, अभिनेता सुव्रत जोशी आदी उपस्थित होते.डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘लहान मुले माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत. त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. मात्र, देशातील प्रत्येक मुलाला त्याचे अधिकार मिळावेत, यासाठी केवळ राजकीय व्यक्तीचीच नाही तर शैक्षणिक संस्था, प्रशासन, कलाकार यांच्यासह सर्व समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही.’’मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘देशात ‘नाईन इज माईन’सारख्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, की ज्या खºया अर्थाने मुलांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने मुलांच्या विविध हक्कांसाठी काही शासन निर्णय काढण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातून राज्यातील अनेक शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे खासगी शाळेतील विद्यार्थी पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.’’कार्यक्रमात नाईन इज माईन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेणाºया गुलाबशा खान, पूजा विश्वकर्मा, लक्ष्मी शर्मा, बाला शर्मा, सोनिया जयस्वाल या मुलींनी आपल्या अडचणी सांगितल्या. तर, बालविवाहाला विरोध करणाºया विद्या ठोके हिने ग्रामीण भगातही उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रोहन बांदेकर विद्यार्थ्यांनेही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलचे संस्थापक एस. बी. अगरवाल, पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त रेणुका चलवादी, युआॅन ज्ञान अंकुर स्कूलच्या नीता पाटील, नारायण गेनबा मोझे स्कूलचे शिरीष सूर्यवंशी, धनेश्वर माध्यमिक विद्यालयाचे डी. व्ही. भाले या वेळी उपस्थित होते.आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शिक्षण घेता येत नाही. शाळेत वेळेत शुल्क न भरल्याने शाळाने परीक्षेला बसू दिले नाही. घरात पालकांकडून मुलगा-मुलगी भेदभाव केला जातो. लहान भावंडांचा सांभाळ करावा लागत असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. पैसे नसल्याने दोन वेळच्या जेवणाची चिंता असते त्यामुळे दहावी-बारावीनंतर घरीच बसावे लागेल, असे पालकांकडून सांगितले जाते, असे साश्रू नयनांनी नाईन इज माईन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनुभव सांगून शिक्षण घेण्यात येणाºया समाजिक, कौटुंबिक व आर्थिक अडचणींवर प्रकाश टाकला. त्यामुळे केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्याच्या अंमलबजावणीत अडचणीच्या ठरणाºया गोंष्टींचाही विचार केला पाहिजे, असे मत उपस्थितांनी मांडले.देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नातील ९ टक्के हिस्सा हा मुलांच्या शिक्षणावर खर्च झालाच पाहिजे; तरच या मुलांना वर्तमानात चांगले शिक्षण घेता येईल. त्यातूनच त्यांचे भविष्य घडणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन व केंद्र शासनाने ९ टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर प्रामाणिकपणे खर्च केली. तरच, देशातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्लब घटकातील मुले या आर्थिक महासत्तेचा भाग होऊ शकतील.- डॉ. सिद्धार्थ धेंडे,उपमहापौर, पुणे महापालिकादेशातील अनेक विद्यार्थ्यांना आजही दर्जेदार शिक्षण घेता येत नाही. कौटुंबिक व आर्थिक कारणांमुळे मुलींना इच्छा नसताना शिक्षण सोडावे लागते. मात्र, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे ध्येय प्राप्त करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे सर्व प्रकारची मदत केली जाईल. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.- डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलपती, अजिंक्य डी. वाय.पाटील विद्यापीठ