शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

शासनाच्या प्रत्येक खात्याची, योजनांची फेरतपासणी झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST

नारायणगाव : शासनाच्या प्रत्येक खात्याची व योजन‍ांची फेरतपासणी झाली पाहिजे. ही तपासणी करून आढावा घेतल्यास त्या संस्थेचा ताळेबंद समजू ...

नारायणगाव : शासनाच्या प्रत्येक खात्याची व योजन‍ांची फेरतपासणी झाली पाहिजे. ही तपासणी करून आढावा घेतल्यास त्या संस्थेचा ताळेबंद समजू शकतो, असे प्रतिपादन पाटोदा (जि. औरंगाबाद) ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

नारायणगाव ग्रामपंचायत व समविचारी प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पेरे पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे होते. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर , राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण मांजरे, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, बाळासाहेब पाटे, उपसरपंच सारीका डेरे, समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे, उपाध्यक्ष आशिष माळवदकर, सचिव राखी रत्नपारखी, हर्षल मुथ्था, ग्रा प सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, संतोष पाटे, गणेश पाटे, राजेश बाप्ते आदी उपस्थित होते.

दरम्यान, भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते वारुळवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी, खोडद, निमदरी, येडगाव, आर्वी, मांजरवाडी , धनगरवाडी, उदापूर येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पेरे पाटील म्हणाले की, महात्मा गांधींची खेड्याकडे चला ही संकल्पना सर्वांनीच आत्मसात करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करायला हवे, पिण्याचे पाणी स्वच्छ वापरले पाहिजे, सांडपाणी जमिनीत जिरविले पाहिजे किंवा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे. मुलांना योग्य शिक्षण दिले जावे. झाडे लावली पाहिजे, अनाथांना, निराधार व्यक्तींना मोफत जेवण दिले पाहिजे. झाडे लावा-झाडे जगवा. हा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीसाठी कामधेनू योजना राबविल्यामुळे ग्रामस्थांना काय फायदा झाला हे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे, राखी रत्नपारखी यांनी केले. आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

३१नारायणगाव

आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भास्करराव पेरे पाटील.