शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

इथेनॉल, सहवीजनिर्मिती प्रकल्पाने मिळाली संजीवनी

By admin | Updated: May 5, 2015 03:00 IST

साखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत

महेश जगताप, सोमेश्वरनगरसाखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत. तेच कारखाने सध्याच्या अडचणीच्या काळात तग धरून आहेत. विशेषत: इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेला मागणी असल्याने या कारखान्यांना फायदेशीर ठरत आहे. या हंगामात साखर उद्योग मंदिच्या सावटखालून चालला आहे. कारखाने सुरू झाल्यापासून वारंवार पडणाऱ्या साखरेच्या दरामुळे राज्य सहकारी बँकेने पाच वेळा साखरेच्या पोत्यावरील मूल्यांकन कमी केले. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. राज्यातील साखर हंगाम संपला तरीही एकाही कारखान्याने शासनाने ठरवून दिलेली एफआरपी दिली नाही. यासाठी शेतकऱ्यांना एफआरपी देता यावी, यासाठी उशिरा का होईना, केंद्र सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून आले आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, याबाबत अजून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील ४० कारखाने वगळता इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजून एफआरपी अदा केली नाही. यासाठी कारखान्यांना अजून अद्याप ४०० ते ५०० रूपये कमी पडत आहेत. केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी २ हजार कोटीची जरी मदत केली असली तरी या रकमेतून शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत. त्याच कारखान्यांकडून एफआरपी प्रमाणे दर मिळू शकतो. राज्यातील ६७ सहकारी व खाजगी कारखान्यांनी साखर उत्पादनांबरोबरच डिस्टलरी प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पाची गुंतवणूक अत्यंत कमी असून नफा मात्र चांगला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढल्याने इथेनॉल बरोबरच अल्कोहोलचे दरही वाढले आहेत. राज्यात सहकारी व खासगी ६७ डिस्टलरी बरोबरच फक्त इथेनॉल निर्मिती करणारे ३४ सहकारी तर ५८ खासगी प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्पांची मिळून वर्षाकाठी ९० ते ९२ कोटी लिटर उत्पादन क्षमता आहे. मात्र चालू वर्षी राज्यातील उपपदार्थ प्रकल्पांमधून केवळ २० कोटी इथेनॉल निर्मिती झाली आहे. सन २०१४— १५ या हंगामात राज्यात ६० ते ६५ कोटी लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी इथेनॉल व अल्कोहोलचे दर ४ ते ५ रूपयांनी वाढले आहेत.