शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल, सहवीजनिर्मिती प्रकल्पाने मिळाली संजीवनी

By admin | Updated: May 5, 2015 03:00 IST

साखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत

महेश जगताप, सोमेश्वरनगरसाखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत. तेच कारखाने सध्याच्या अडचणीच्या काळात तग धरून आहेत. विशेषत: इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेला मागणी असल्याने या कारखान्यांना फायदेशीर ठरत आहे. या हंगामात साखर उद्योग मंदिच्या सावटखालून चालला आहे. कारखाने सुरू झाल्यापासून वारंवार पडणाऱ्या साखरेच्या दरामुळे राज्य सहकारी बँकेने पाच वेळा साखरेच्या पोत्यावरील मूल्यांकन कमी केले. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. राज्यातील साखर हंगाम संपला तरीही एकाही कारखान्याने शासनाने ठरवून दिलेली एफआरपी दिली नाही. यासाठी शेतकऱ्यांना एफआरपी देता यावी, यासाठी उशिरा का होईना, केंद्र सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून आले आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, याबाबत अजून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील ४० कारखाने वगळता इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजून एफआरपी अदा केली नाही. यासाठी कारखान्यांना अजून अद्याप ४०० ते ५०० रूपये कमी पडत आहेत. केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी २ हजार कोटीची जरी मदत केली असली तरी या रकमेतून शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत. त्याच कारखान्यांकडून एफआरपी प्रमाणे दर मिळू शकतो. राज्यातील ६७ सहकारी व खाजगी कारखान्यांनी साखर उत्पादनांबरोबरच डिस्टलरी प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पाची गुंतवणूक अत्यंत कमी असून नफा मात्र चांगला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढल्याने इथेनॉल बरोबरच अल्कोहोलचे दरही वाढले आहेत. राज्यात सहकारी व खासगी ६७ डिस्टलरी बरोबरच फक्त इथेनॉल निर्मिती करणारे ३४ सहकारी तर ५८ खासगी प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्पांची मिळून वर्षाकाठी ९० ते ९२ कोटी लिटर उत्पादन क्षमता आहे. मात्र चालू वर्षी राज्यातील उपपदार्थ प्रकल्पांमधून केवळ २० कोटी इथेनॉल निर्मिती झाली आहे. सन २०१४— १५ या हंगामात राज्यात ६० ते ६५ कोटी लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी इथेनॉल व अल्कोहोलचे दर ४ ते ५ रूपयांनी वाढले आहेत.