शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

शाश्वत मुल्यांशी जोडलेले लेखक हवेत  : भारत सासणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:02 IST

लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे. बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही.

ठळक मुद्देलघुकथा हा परदेशी प्रकार नसून त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहात

पुणे : सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लेखकाला लघुकथा लिहायची असते. त्यासाठी त्याला जगण्याची, जीवनपटलाच्या परिघाची जाण असावी लागते. जीवनातील अशाश्वत आणि शाश्वत मुल्ये समजून घ्यावी लागतात. केवळ बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. शाश्वत मुल्यांशी जोडलेले, सर्वसामान्यांच्या जगण्याचा शोध घेणारे लेखक वाचकांच्या मनावर कायमस्वरुपी नाव कोरतात, असे मत ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी व्यक्त केली. सिग्नेट पब्लिकेशनतर्फे रवींद्र जोगळेकर लिखित ‘हास्य बाराखडी’ या विनोदी कथासंग्रहाचे आणि ‘झाले मोकळे आकाश’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सासणे यांच्या हस्ते बुधवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, एकपात्री कलाकार बंडा जोशी उपस्थित होते. सासणे म्हणाले, ‘समाजाचे विचार, चिंतन, आव्हाने बदलली तसा लघुकथेचा चेहरामोहराही बदलत गेला. लघुकथा हा परदेशी प्रकार नसून, त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहातच दडलेली आहेत. कालानुरुप कथाकारासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. कथेमधून त्याला सद्यस्थितीचा विचार करुन मांडणी करायची असते. लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे.’बंडा जोशी म्हणाले, ‘विनोदामध्ये मोठे सामर्थ्य असते. दररोजच्या ताणतणावातून विनोदामुळे आनंदी जगता येते. आनंद देणे आणि घेणे हेच विनोदी वाड.मयाचे उद्दिष्ट असते. विनोदी साहित्य जीवनाचा अत्यंत वेगळया दृष्टीने विचार करते. विनोद  ताणतणाव दूर ठेवणारे बुलेटप्रूफ जॅकेट असते. माणूस खळाळून हसतो तेव्हा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे विनोदी लेखन करणारे समाजाचे सेवकच असतात. सध्या विनोदी लेखन करणारे मोजके लेखक पहायला मिळतात. दररोजच्या जीवनातील ताणतणाव वाढत असताना गुणवत्तापूर्ण विनोदी लेखनही वाढले पाहिजे.’रवींद्र जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे