शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

शाश्वत मुल्यांशी जोडलेले लेखक हवेत  : भारत सासणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:02 IST

लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे. बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही.

ठळक मुद्देलघुकथा हा परदेशी प्रकार नसून त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहात

पुणे : सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लेखकाला लघुकथा लिहायची असते. त्यासाठी त्याला जगण्याची, जीवनपटलाच्या परिघाची जाण असावी लागते. जीवनातील अशाश्वत आणि शाश्वत मुल्ये समजून घ्यावी लागतात. केवळ बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. शाश्वत मुल्यांशी जोडलेले, सर्वसामान्यांच्या जगण्याचा शोध घेणारे लेखक वाचकांच्या मनावर कायमस्वरुपी नाव कोरतात, असे मत ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी व्यक्त केली. सिग्नेट पब्लिकेशनतर्फे रवींद्र जोगळेकर लिखित ‘हास्य बाराखडी’ या विनोदी कथासंग्रहाचे आणि ‘झाले मोकळे आकाश’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सासणे यांच्या हस्ते बुधवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, एकपात्री कलाकार बंडा जोशी उपस्थित होते. सासणे म्हणाले, ‘समाजाचे विचार, चिंतन, आव्हाने बदलली तसा लघुकथेचा चेहरामोहराही बदलत गेला. लघुकथा हा परदेशी प्रकार नसून, त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहातच दडलेली आहेत. कालानुरुप कथाकारासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. कथेमधून त्याला सद्यस्थितीचा विचार करुन मांडणी करायची असते. लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे.’बंडा जोशी म्हणाले, ‘विनोदामध्ये मोठे सामर्थ्य असते. दररोजच्या ताणतणावातून विनोदामुळे आनंदी जगता येते. आनंद देणे आणि घेणे हेच विनोदी वाड.मयाचे उद्दिष्ट असते. विनोदी साहित्य जीवनाचा अत्यंत वेगळया दृष्टीने विचार करते. विनोद  ताणतणाव दूर ठेवणारे बुलेटप्रूफ जॅकेट असते. माणूस खळाळून हसतो तेव्हा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे विनोदी लेखन करणारे समाजाचे सेवकच असतात. सध्या विनोदी लेखन करणारे मोजके लेखक पहायला मिळतात. दररोजच्या जीवनातील ताणतणाव वाढत असताना गुणवत्तापूर्ण विनोदी लेखनही वाढले पाहिजे.’रवींद्र जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे