शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी?, सहकार विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:43 IST

इंदापूर : कर्जमाफीबाबतच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली देत पात्र थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे.

इंदापूर : कर्जमाफीबाबतच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली देत पात्र थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे. याबाबत सहकार विभागाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे पत्र आपण सहकार मंत्रालयास देणार आहोत, अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी (दि.२६) इंदापूरला पत्रकार परिषदेत दिली.आमच्या सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणात काही त्रुटी असू शकतील. त्या शोधून दुरुस्त केल्या जातील. बँकेकडून मिळणाºया व लोकांमधून मिळणाºया माहितीमध्ये फरक पडतो आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. कर्जदार, थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारा मात्र सध्या अडचणीत असणारा असा एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित रहाणार नाही, अशी ग्वाही दिली.खोत म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्या या सभापती व उपसभापतींच्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठीच स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटावे, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हिताला प्राधान्य देतील अशा स्वरुपाच्या बाजार समित्या निर्माण करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. खासगी स्वरूपात बाजार समित्या स्थापन करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. बाजार समित्यांनी या स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिज, असे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भोसले, प्रा. सुहास पाटील, बाळासाहेब पाटील, चित्तरंजन पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, इंदापूरचे तालुकाध्यक्ष नीलेश देवकर, बळीराम गायकवाड व इतर उपस्थित होते.गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणीशेजारच्या घरात चांगले चालले असेल तर त्यांचा दुस्वास न करता आशीर्वाद देण्याएवढं मोठ मन ठेवावे. ते काही जणांकडे नसतं अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी खासदार राजू शेट्टी यांना लक्ष्य केले. वाटा अलग झाल्या, काही हरकत नाही. मी मैदानातला, लढाईतला, संघर्षातला माणूस आहे. जनता हे आमचे परीक्षा केंद्र आहे. अतिशय थातूरमातूर विषय तयार करून एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकलं. त्या निर्णयाचेही आम्ही खुल्या मनाने स्वागत केले. कारण आम्हालाही या कंपनीत राहायचे नव्हते. पुन्हा कधी दोघे एकत्र येणार का? या प्रश्नावर स्मितहास्य करत ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी’ एवढीच सूचक प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी