शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कर्जमाफीच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी?, सहकार विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:43 IST

इंदापूर : कर्जमाफीबाबतच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली देत पात्र थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे.

इंदापूर : कर्जमाफीबाबतच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली देत पात्र थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे. याबाबत सहकार विभागाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे पत्र आपण सहकार मंत्रालयास देणार आहोत, अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी (दि.२६) इंदापूरला पत्रकार परिषदेत दिली.आमच्या सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणात काही त्रुटी असू शकतील. त्या शोधून दुरुस्त केल्या जातील. बँकेकडून मिळणाºया व लोकांमधून मिळणाºया माहितीमध्ये फरक पडतो आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. कर्जदार, थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारा मात्र सध्या अडचणीत असणारा असा एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित रहाणार नाही, अशी ग्वाही दिली.खोत म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्या या सभापती व उपसभापतींच्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठीच स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटावे, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हिताला प्राधान्य देतील अशा स्वरुपाच्या बाजार समित्या निर्माण करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. खासगी स्वरूपात बाजार समित्या स्थापन करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. बाजार समित्यांनी या स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिज, असे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भोसले, प्रा. सुहास पाटील, बाळासाहेब पाटील, चित्तरंजन पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, इंदापूरचे तालुकाध्यक्ष नीलेश देवकर, बळीराम गायकवाड व इतर उपस्थित होते.गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणीशेजारच्या घरात चांगले चालले असेल तर त्यांचा दुस्वास न करता आशीर्वाद देण्याएवढं मोठ मन ठेवावे. ते काही जणांकडे नसतं अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी खासदार राजू शेट्टी यांना लक्ष्य केले. वाटा अलग झाल्या, काही हरकत नाही. मी मैदानातला, लढाईतला, संघर्षातला माणूस आहे. जनता हे आमचे परीक्षा केंद्र आहे. अतिशय थातूरमातूर विषय तयार करून एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकलं. त्या निर्णयाचेही आम्ही खुल्या मनाने स्वागत केले. कारण आम्हालाही या कंपनीत राहायचे नव्हते. पुन्हा कधी दोघे एकत्र येणार का? या प्रश्नावर स्मितहास्य करत ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी’ एवढीच सूचक प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी