शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

समन्वयाच्या अभावामुळे ‘बीआरटी’त त्रुटी - प्रांजली देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:18 IST

मागील काही वर्षांपासून शहरात सुरू झालेल्या बस रॅपिड ट्रान्झिंट (बीआरटी) या सेवेकडे दोन्ही महापालिकांसह पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समन्वय राहिला नाही. परिणामी, बीआरटी मार्गातील त्रुटी वर्षानुवर्षे तशाच राहिल्या.

मागील काही वर्षांपासून शहरात सुरू झालेल्या बस रॅपिड ट्रान्झिंट (बीआरटी) या सेवेकडे दोन्ही महापालिकांसह पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे समन्वय राहिला नाही. परिणामी, बीआरटी मार्गातील त्रुटी वर्षानुवर्षे तशाच राहिल्या. ‘पीएमपी’कडून या मार्गांवर बसेसच्या नियमित फेऱ्या दिल्या गेल्या नाहीत. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन यापुढील काळात बीआरटीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरच त्यामध्ये सुधारणा होऊ शकतील, अशी अपेक्षा वाहतूकतज्ज्ञ व बीआरटी समितीच्या सदस्या प्रांजली देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.देशात सर्वाधिक प्रवासी असलेले बीआरटी मार्ग म्हणून पुणे व पिंपरी चिंचवडमधील बीआरटी मार्गांची ओळख बनली आहे. हे सर्व मार्ग ‘हायब्रीड’ आहेत. प्रवाशांकडून बीआरटीसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीच्या काळात खासगी वाहने सोडून जवळपास १२ टक्क्यांहून अधिक प्रवासी बीआरटीकडे वळाले होते. त्यावेळी बसेसची वारंवारिताही चांगली होती. पण कालांतराने त्याकडे दुर्लक्ष होत गेले. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच पीएमपी प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे बसेसची वारंवारिता कमी झाली. या मार्गावर चांगल्या क्षमतेच्या, आरामदायी बसेसहीकमी आहेत. बहुतेक मार्गांवरअनेक त्रुटी दिसून येतात. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित बससेवामिळत नाही, असे देशपांडे यांनी सांगितले.बीआरटी मार्ग सक्षम झाले तर त्याकडे प्रवासी आकर्षित होतील. त्यामुळे रस्त्यांवरील खासगी वाहने कमी होऊन वाहतुकीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल. तसेच या मार्गावरील प्रवाशांना चांगल्या सुविधाही मिळणे गरजेचे आहे. आरामदायी बस असतील तर प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ शकेल. त्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी समिती स्थापन केली आहे. बीआरटी मार्गावरील त्रुटी दूर करून प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, हे समितीचे ध्येय आहे. समितीमध्ये दोन्ही पालिकेतील संबंधित अधिकारी, प्रवासीप्रतिनिधी, वाहतूकतज्ज्ञ, पीएमपीतील अधिकारी आहेत. त्यामुळे आतासर्व यंत्रणांमध्ये समन्वय व संवाद सुरू झाला आहे.समितीने सध्या जे मार्ग आहेत, त्यातील त्रुटी दूर करण्याकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. नगर रस्त्यावरील प्रवासीसंख्या अधिक असल्याने या मार्गाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. सिग्नल यंत्रणा, बसस्थानकांची दुर्दशा, तुटलेली बॅरिकेट्स, दरवाजे, वाहनांची घुसखोरी अशा त्रुटी दिसून आल्या. या त्रुटी दूर करण्याबाबत समितीच्या बैठकीमध्ये पाठपुरावा केला जात आहे. काही त्रुटींवर तातडीने उपाययोजना केल्या जाऊ शकतात. तसेच सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार त्रुटी दूर करायला हव्यात.समितीने त्रुटींबाबत ‘आॅडिट लिस्ट’ तयार करून दिली आहे. काही उपाययोजना सुचविल्या आहेत. नगर रस्त्यावर काही चौक खूप मोठे आहे. हे चौक लहान करणे, पादचारी सिग्नल उभारणे, बसेसची वारंवारिता वाढविणे, आरामदायी बस उपलब्ध करून देणे, प्रवाशांचे प्रबोधन, चालक-वाहकांना प्रशिक्षण, मी कार्डचा सक्षमपणे वापर करणे अशा काही गोष्टी करण्याची गरज आहे.नवीन बसेस घेण्याबाबतही तातडीने निर्णय व्हायला हवा. ईलेक्ट्रिक बस बीआरटी मार्गासाठी चांगल्या आहेत. केवळ त्यांचे तिकीट साध्या बसेसप्रमाणेच ठेवायला हवे. असे झाल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकेल. बीआरटी सेलही आणखी सक्षम करणे आवश्यक आहे.सध्या या मार्गांवर भाडेतत्त्वावरील बस धावतात. त्यांची देखभाल-दुरुस्तीवर पीएमपी नियंत्रण नाही. त्यासह मार्गांच्या पाहणीसाठीही नियंत्रण यंत्रणा उभी करायला हवी. त्यासाठी भरारी पथके नेमणे अपेक्षित आहे.दोन्ही पालिकांनी ‘बीआरटी देखभाल-दुरुस्ती वाहन’ दिल्यास हे प्रश्न लवकर मार्गी लागू शकतील. हे वाहन सतत केवळ बीआरटी रस्त्यावरून जाईल. या मार्गांवर आढळून आलेल्या छोट्या-छोट्या त्रुटी तातडीने दुरुस्त होऊ शकतील. या सर्व बाबींचा आता समितीकडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे देशपांडे म्हणाल्या.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या