शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:34 IST

डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

पुणे - डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आॅनलाईनच्या जमान्यात चित्रपट, माहितीपट हे माध्यम सर्वांत प्रभावी ठरू शकते. मात्र, भारतामध्ये पर्यावरण, वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही, अशी खंत दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थू यांनी गुरुवारी व्यक्त केली.किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक आणि छायाचित्रकार नल्लामुथ्थू यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी पार पडले. यावेळी माधव चंद्रचूड, महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र चित्राव, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, परिणीता दांडेकर, गुरमित सपल, विभूती देववर्मा उपस्थित होते.विभूती देववर्मा यांना (संस्था), गुरमीत सपल (चित्रपट निमार्ता), परिणिता दांडेकर (कार्यकर्त्या) यांना यावेळी किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.विभूती देववर्मा म्हणाले, ‘जंगलात राहून जंगल वाचवून संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम सुरू करताना प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र, हळूहळू बरेच तरुण पुढे येऊ लागले. लहानसहान प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे, हाच मूळ उद्देश आहे. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.’गुरमीत सपल म्हणाले, ‘चित्रपट निर्माता म्हणून पर्यावरण आणि वन्यजीवनाशी खूप जवळचा संबध आला. आजकाल सकाळी उठल्या उठल्या पर्यावरणाचा ºहास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. पृथ्वीवरील आपले भविष्य असुरक्षित आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर कलेतून जनजागृती घडवणे आवश्यक आहे. यातून भविष्यात चांगले परिणाम पहायला मिळतील, अशी आशा वाटते.’ परिणीता दांडेकर म्हणाल्या, ‘नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. मेट्रो, बंधारे, रस्ते अशा अडथळ्यांनी नद्यांवर आक्रमण केले जात आहे. जीवित नदी हे नागरीकरणाचे आणि जीवित जगाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.’ 

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे