शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:34 IST

डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

पुणे - डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आॅनलाईनच्या जमान्यात चित्रपट, माहितीपट हे माध्यम सर्वांत प्रभावी ठरू शकते. मात्र, भारतामध्ये पर्यावरण, वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही, अशी खंत दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थू यांनी गुरुवारी व्यक्त केली.किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक आणि छायाचित्रकार नल्लामुथ्थू यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी पार पडले. यावेळी माधव चंद्रचूड, महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र चित्राव, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, परिणीता दांडेकर, गुरमित सपल, विभूती देववर्मा उपस्थित होते.विभूती देववर्मा यांना (संस्था), गुरमीत सपल (चित्रपट निमार्ता), परिणिता दांडेकर (कार्यकर्त्या) यांना यावेळी किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.विभूती देववर्मा म्हणाले, ‘जंगलात राहून जंगल वाचवून संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम सुरू करताना प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र, हळूहळू बरेच तरुण पुढे येऊ लागले. लहानसहान प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे, हाच मूळ उद्देश आहे. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.’गुरमीत सपल म्हणाले, ‘चित्रपट निर्माता म्हणून पर्यावरण आणि वन्यजीवनाशी खूप जवळचा संबध आला. आजकाल सकाळी उठल्या उठल्या पर्यावरणाचा ºहास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. पृथ्वीवरील आपले भविष्य असुरक्षित आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर कलेतून जनजागृती घडवणे आवश्यक आहे. यातून भविष्यात चांगले परिणाम पहायला मिळतील, अशी आशा वाटते.’ परिणीता दांडेकर म्हणाल्या, ‘नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. मेट्रो, बंधारे, रस्ते अशा अडथळ्यांनी नद्यांवर आक्रमण केले जात आहे. जीवित नदी हे नागरीकरणाचे आणि जीवित जगाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.’ 

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे