शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

पर्यावरण चित्रपटांना व्यासपीठ हवे, नल्लामुथ्थू यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:34 IST

डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

पुणे - डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आॅनलाईनच्या जमान्यात चित्रपट, माहितीपट हे माध्यम सर्वांत प्रभावी ठरू शकते. मात्र, भारतामध्ये पर्यावरण, वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नाही, अशी खंत दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थू यांनी गुरुवारी व्यक्त केली.किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक आणि छायाचित्रकार नल्लामुथ्थू यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी पार पडले. यावेळी माधव चंद्रचूड, महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र चित्राव, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, परिणीता दांडेकर, गुरमित सपल, विभूती देववर्मा उपस्थित होते.विभूती देववर्मा यांना (संस्था), गुरमीत सपल (चित्रपट निमार्ता), परिणिता दांडेकर (कार्यकर्त्या) यांना यावेळी किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.विभूती देववर्मा म्हणाले, ‘जंगलात राहून जंगल वाचवून संशोधन, जतन आणि संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम सुरू करताना प्रारंभी खूप अडचणी आल्या. मात्र, हळूहळू बरेच तरुण पुढे येऊ लागले. लहानसहान प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन देणे, हाच मूळ उद्देश आहे. त्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत.’गुरमीत सपल म्हणाले, ‘चित्रपट निर्माता म्हणून पर्यावरण आणि वन्यजीवनाशी खूप जवळचा संबध आला. आजकाल सकाळी उठल्या उठल्या पर्यावरणाचा ºहास झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. पृथ्वीवरील आपले भविष्य असुरक्षित आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर कलेतून जनजागृती घडवणे आवश्यक आहे. यातून भविष्यात चांगले परिणाम पहायला मिळतील, अशी आशा वाटते.’ परिणीता दांडेकर म्हणाल्या, ‘नद्या या पृथ्वीच्या वाहिन्या आहेत. मेट्रो, बंधारे, रस्ते अशा अडथळ्यांनी नद्यांवर आक्रमण केले जात आहे. जीवित नदी हे नागरीकरणाचे आणि जीवित जगाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.’ 

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे