शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजन विश्व नव्या जोमाने नक्कीच भरारी घेईल : क्षितिज पटवर्धन, लेखक आणि गीतकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

कोरोनाचा सुरुवातीचा काळ हा कलाकारांसाठी भीती आणि चांगल्या गोष्टी मार्गी लागत असताना असं अचानकमध्ये काय झालं असं वाटण्यात गेला. ...

कोरोनाचा सुरुवातीचा काळ हा कलाकारांसाठी भीती आणि चांगल्या गोष्टी मार्गी लागत असताना असं अचानकमध्ये काय झालं असं वाटण्यात गेला. त्याची तीव्रता सुरुवातीला फारशी जाणवली नाही. पण जशी त्याची व्याप्ती वाढायला लागली तशी आता हे आपल्या जवळपास यायला लागलंय असं वाटायला लागलं. माणूस हा मूलभूत गरजांनंतर मनोरंजनाकडे वळतो. याचा अर्थ मनोरंजन क्षेत्र हे शेवटच्या पायरीवर आहे पण याचा परिणाम सर्वप्रथम या क्षेत्रावरच होतो. हा केवळ आजार नाही तर याचा संपूर्ण जीवनावर परिणाम होणार आहे हे जाणवलं. आपण घरात बसून सोशल डिस्टन्सिंग पाळून काटकसर करायला हवी याची जाणीव झाली. आजवर कोणत्याच माणसाला एवढा मोकळा वेळ मिळाला नव्हता. तो कोरोना काळात मिळाला. खूप नवीन गोष्टी सर्वांनाच करायला मिळाल्या. जे काही मिळालं त्यात कृतघ्न राहायला हवं. आपल्याला काय हवंय आणि किती कमावायंचय हे कळलं. भीती ते वास्तवाकडे जाण्याचा हा प्रवास होता. माणसाचा माणसाशी संवाद, मित्रांनी मारलेली मिठी या छोट्या-छोट्या गोष्टींची किंमत कळाली. कोरोनाने एक धडा शिकविला. प्रत्येक माणसाने आपली मागणी किती आहे, मला एवढंच लागतं असं गृहीत धरलं तर आपण समाज किंवा पर्यावरण यासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो याची जाणीव झाली. आपण शासनावरून अवलंबून राहाणं टाळायला हवं. पडद्यामागच्या कलाकारांना मदतीची गरज आहेचं यात दुमत नाही. पण प्रस्थापित कलाकार, निर्मात्यांना त्याची फारशी गरज वाटत नाही. कोरोना काळात श्रमाला प्रतिष्ठा आली. ‘बुद्धिजीवी वर्ग हा श्रमजीवी’ झाला. प्रतिष्ठेपेक्षा पोट महत्त्वाचं आहे हे सर्वांना कळून चुकलं ही जमेची बाजू म्हणता येईल.

----------------------------