शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परदेशातून येणा-यांच्या माहितीची खातरजमा

By admin | Updated: August 29, 2014 04:27 IST

इबोलाची साथ पसरलेल्या देशांमधून भारतात परत येणाऱ्या प्रवाशांकडून विमानतळावर आल्यानंतर खोटी माहिती दिली जात असल्याची बाब समोर आली आहे

पुणे : इबोलाची साथ पसरलेल्या देशांमधून भारतात परत येणाऱ्या प्रवाशांकडून विमानतळावर आल्यानंतर खोटी माहिती दिली जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे स्थानिक आरोग्य विभागांना जिकिरीचे जात असल्याची बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्याच्या आरोग्य विभाग पुणे आणि मुंबई विमानतळ प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार असून, या नागरिकांच्या माहितीची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ‘इबोलाच्या भीतीने आरोग्य विभागाची घालमेल’ या वृत्ताद्वारे ही बाब लोकमतने समोर आणली होती.गेल्या दोन आठवड्यांत ४६ नागरिक या आजाराची साथ असलेल्या देशांमधून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील आहेत. त्यातील जवळपास १५ नागरिकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक दिले असून, काही जणांचे मोबाईल पुण्यात आल्यापासून नॉट रिचेबल आहेत. याबाबत डॉ. जगताप म्हणाल्या की, विमानतळावर आल्यावरच या नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात येते. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. मात्र, मोबाईल क्रमांक चुकीचा देणे ही बाब गंभीर असल्याने तसेच या साथीच्या आजाराचा धोका असल्याने हे प्रकार घडू नयेत, यासाठी लोहगाव व मुंबई विमानतळ प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल. तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक आणि दिलेला पत्ता याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांचे तिकीट त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक, पत्ता, पासपोर्टवरील पत्ता या विविध माध्यमांद्वारे त्या नागरिकांना शोधणे शक्य असल्याने ही माहिती उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली जाईल, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)