शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणाच्या भूखंडांना अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते.

रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते. मात्र कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. नवनगर विकास प्राधिकरणाने अनेक भूखंडांवरील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. मात्र त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राखीव भूखंडावर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा निर्माण झालेला आहे. रोज होणाºया अतिक्रमणाला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासीय विचारू लागले आहेत.शहरातील काळेवाडी, रहाटणी, थेरगाव भागातील अनेक ठिकाणच्या प्राधिकरणाच्या राखीव जागेवर अनेक प्रकारचे अतिक्रमण करून भूखंड ताब्यात घेतल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, अशा भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचे काम अनेक वेळा प्राधिकरणाकडून करण्यात आलेले आहे. तरीही पुन: पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होते कसे हा एक संशोधनाचा विषय आहे. अतिक्रमण कारवाई केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते. याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही व तक्रारी वाढू लागल्या, की पुन्हा फक्त कारवाई केल्याचे दिसून येते.थेरगाव हद्दीतील एमएम शाळेशेजारी मागील अनेकवर्षांपासून प्राधिकरणाच्या जागेवर अनेक भंगारवाले आपले दुकानथाटले आहे त्या ठिकाणी शेकडो टन कचरा गोळा करून त्या कचºयाचे वर्गीकरण करून त्या ठिकाणाहून विक्री केली जाते. मात्र या ठिकाणी अनेक वेळा कारवाई करून ही दुकाने हटवण्यात आली. मात्र, पुन्हा या ठिकाणी अनेक दुकाने थाटलेली दिसून येत आहेत.या भंगार व्यावसायिकांनी बाजारात न विकणारा माल पवना नदीपात्रामध्ये टाकून नदीदेखील प्रदूषित केल्याचे दिसून येत आहे. हे होत असताना महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य विभाग व प्राधिकरणाचे प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणाला महापालिका प्रशासन व प्राधिकरण प्रशासन कधी आळा घालणार, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणात हवा सुटली, की या ठिकाणचा सर्व कचरा मुख्य रस्त्यावर येतो. त्यामुळे परिसर कितीही स्वच्छ केला, तरी परिसरात स्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळे चांगले काम करणाºया आरोग्य विभागावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील अनधिकृत असलेले हे भंगाराचे दुकान हटवण्याची मागणी परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड