शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

प्राधिकरणाच्या भूखंडांना अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 00:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते.

रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे शहरातील राखीव भूखंडावर दिवसेंदिवस होणाऱ्या अतिक्रमणावर वारंवार कारवाई केली जाते. मात्र कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. नवनगर विकास प्राधिकरणाने अनेक भूखंडांवरील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. मात्र त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राखीव भूखंडावर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा निर्माण झालेला आहे. रोज होणाºया अतिक्रमणाला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासीय विचारू लागले आहेत.शहरातील काळेवाडी, रहाटणी, थेरगाव भागातील अनेक ठिकाणच्या प्राधिकरणाच्या राखीव जागेवर अनेक प्रकारचे अतिक्रमण करून भूखंड ताब्यात घेतल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, अशा भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचे काम अनेक वेळा प्राधिकरणाकडून करण्यात आलेले आहे. तरीही पुन: पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होते कसे हा एक संशोधनाचा विषय आहे. अतिक्रमण कारवाई केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते. याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही व तक्रारी वाढू लागल्या, की पुन्हा फक्त कारवाई केल्याचे दिसून येते.थेरगाव हद्दीतील एमएम शाळेशेजारी मागील अनेकवर्षांपासून प्राधिकरणाच्या जागेवर अनेक भंगारवाले आपले दुकानथाटले आहे त्या ठिकाणी शेकडो टन कचरा गोळा करून त्या कचºयाचे वर्गीकरण करून त्या ठिकाणाहून विक्री केली जाते. मात्र या ठिकाणी अनेक वेळा कारवाई करून ही दुकाने हटवण्यात आली. मात्र, पुन्हा या ठिकाणी अनेक दुकाने थाटलेली दिसून येत आहेत.या भंगार व्यावसायिकांनी बाजारात न विकणारा माल पवना नदीपात्रामध्ये टाकून नदीदेखील प्रदूषित केल्याचे दिसून येत आहे. हे होत असताना महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग, आरोग्य विभाग व प्राधिकरणाचे प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणाला महापालिका प्रशासन व प्राधिकरण प्रशासन कधी आळा घालणार, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणात हवा सुटली, की या ठिकाणचा सर्व कचरा मुख्य रस्त्यावर येतो. त्यामुळे परिसर कितीही स्वच्छ केला, तरी परिसरात स्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळे चांगले काम करणाºया आरोग्य विभागावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील अनधिकृत असलेले हे भंगाराचे दुकान हटवण्याची मागणी परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड